शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील माळवाडी येथून मंगळवारी (दि. ५) रात्री चोरांनी दोन शेळ्यांची चोरी केल्याची घटना घडली असून याप्रकरणी अविनाश लक्ष्मण भाकरे (वय ३५), रा. माळवाडी, टाकळी हाजी यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
भाकरे यांच्या शेळ्या पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेल्या असताना, चोरांनी दोन शेळ्या चोरून नेल्या. चोरून नेलेल्या शेळ्यांची एकूण किंमत अंदाजे ३० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. शिरूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार शिवाजी बनकर तपास करत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी निमगाव दुडे आणि टाकळी हाजी परिसरातून म्हैस चोरीची प्रकरणे घडली होती. त्या घटनांचा तपास अद्याप अपूर्ण असतानाच पुन्हा एकदा पशुधन चोरीची घटना घडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
एकीकडे बिबट्याचे हल्ले आणि दुसरीकडे चोरट्यांची वाढती धाडसी कृत्ये पाहता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपल्या पशुधनाचे रक्षण करणे मोठे आव्हान ठरत आहे. पोलिसांनी या प्रकारांची गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ तपास पूर्ण करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.या चोरीच्या घटनांचा कसून तपास सुरू असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, दिलीप पवार, पोलिस उपनिरीक्षक शिरूर
मुंबई: लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ओळख सत्ता किंवा पदावरून नव्हे, तर जनतेच्या विश्वासावरून ठरते. हा…
सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान; एकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा शिरुर…
बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे परभणी:…
मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध…
मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने…
छत्रपती संभाजीनगर : 'सेफ फूड – सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन (FDA) ने…