शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील माळवाडी येथून मंगळवारी (दि. ५) रात्री चोरांनी दोन शेळ्यांची चोरी केल्याची घटना घडली असून याप्रकरणी अविनाश लक्ष्मण भाकरे (वय ३५), रा. माळवाडी, टाकळी हाजी यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
भाकरे यांच्या शेळ्या पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेल्या असताना, चोरांनी दोन शेळ्या चोरून नेल्या. चोरून नेलेल्या शेळ्यांची एकूण किंमत अंदाजे ३० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. शिरूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार शिवाजी बनकर तपास करत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी निमगाव दुडे आणि टाकळी हाजी परिसरातून म्हैस चोरीची प्रकरणे घडली होती. त्या घटनांचा तपास अद्याप अपूर्ण असतानाच पुन्हा एकदा पशुधन चोरीची घटना घडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
एकीकडे बिबट्याचे हल्ले आणि दुसरीकडे चोरट्यांची वाढती धाडसी कृत्ये पाहता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपल्या पशुधनाचे रक्षण करणे मोठे आव्हान ठरत आहे. पोलिसांनी या प्रकारांची गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ तपास पूर्ण करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.या चोरीच्या घटनांचा कसून तपास सुरू असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, दिलीप पवार, पोलिस उपनिरीक्षक शिरूर
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…
मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…
मुंबई: जनगणनेचा अहवाल २०२७ मध्ये पूर्ण होणार असताना, वर्षभरात उपलब्ध होणाऱ्या ताज्या आकडेवारीऐवजी ११ वर्षांपूर्वीच्या…
मुंबई: राज्यातील महिला सुरक्षेशी संबंधित शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून महिलांना…
बिहारच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, ते पाहून जुन्या नाटककारांना देखील लाज वाटावी! पडद्यावर…