क्राईम

शिक्रापूरात दगडफेक करत चोरट्यांनी पळवला लाखांचा ऐवज

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील दिघे वस्ती येथे रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चोरी करत व्यक्तींवर दगडफेक करत जखमी केल्याची घटना घडली असल्याने 3 अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील दिघे वस्ती येथे राहणारे सोमनाथ टेमगीरे व सिराज शेख हे १७ फेब्रुवारी रोजी त्यांच्या घरात झोपलेले असताना पहाटे तीन च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी टेमगिरे व शेख यांच्या घराच्या दरवाजाची कडी उचकटून घरात प्रवेश करुन कपाटात असलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल व काही कागदपत्रे काढून घेतले.

दरम्यान टेमगीरे जागे झाले असता त्यांनी शेजारील नागरिकांना आवाज दिला असता तिघा चोरट्यांनी सोमनाथ टेमगीरे व सिराज शेख यांच्यावर दगडफेक केली.यामध्ये सोमनाथ नानाभाऊ टेमगीरे व सिराज गुलामरसूल शेख हे दोघे किरकोळ जखमी झाले असून याबाबत सोमनाथ नानाभाऊ टेमगिरे (वय ३४) रा. दिघे वस्ती शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात 3 चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

11 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

15 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

15 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

15 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

15 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

15 तास ago