ग्राम सुरक्षा दल व पोलीस मित्रांना कार्यन्वित करण्याची आवश्यकता
शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) सह परिसरातील आदी गावांमध्ये चोऱ्या, दरोड्यांची संख्या वाढू लागलेली असल्याने नागरिकांचे मोठे नुकसान देखील होत असल्याने परिसरात पोलिसांनी ग्राम सुरक्षा दल व पोलीस मित्रांच्या मदतीने गस्त घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) जवळील अनेक गावांमध्ये मोबाईल व दुचाक्या चोरींच्या घटना नियमित व सर्रास पणे घडत असताना सध्या घरफोड्या व दरोड्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेली असताना यातील आरोपी पकडणे पोलिसांना शक्य झालेले नाही. यापूर्वी काही वर्षांपूर्वी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे असलेल्या प्रभारी पोलीस निरीक्षकांनी पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक गावांमध्ये ग्राम सुरक्षा दल तसेच पोलीस मित्र संघ स्थापन करत प्रत्येक गावातून स्व खुशीने पोलिसांच्या मदत करणाऱ्या युवकांचे संघटन करुन त्यांना रात्र गस्त साठी घेऊन वारंवार त्यांच्याशी संपर्कात राहून गावासह गावातील वस्त्यांचे चोऱ्यांपासून संरक्षण केले आहे. यापूर्वी पोलीस मित्रांकडून सुरु असलेल्या रात्रगस्ती दरम्यान अनेक चोरटे व आरोपी देखील जाळ्यात सापडलेले होते.
परंतु अलीकडील काही काळामध्ये पोलिसांचा नागरिकांशी असलेला सुसंवाद काही प्रमाणात दुरावला गेलेला असल्याने नागरिक देखील पुढे येत नसून ग्राम सुरक्षा दल तसेच पोलीस मित्र संघ देखील नाहीसा झाल्याची चिन्हे आहेत, तर काही ठिकाणी नागरिक आपल्या परिसराचे रक्षण करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत आहेत. परंतु चोऱ्यांच्या घटना वाढू लागल्याने पोलिसांसह नागरिकांनी देखील सतर्क राहणे काळाची गरज निर्माण झाली आहे.
चोरट्यांकडून बंद घरे लक्ष
चोरांकडून चोरीच्या घटना घडत असताना चोरट्यांकडून बंद घरे, काही दिवस बंद असलेली घरे तसेच लोकवस्ती पासून लांब असलेली घरे तसेच दुकाने लक्ष करुन त्याच ठिकाणी चोऱ्या करण्यात येत आहेत.
सध्या पाबळ औट पोस्टच्या हद्दीमध्ये चोऱ्यांच्या घटना वाढू लागलेल्या असल्याने त्या ठिकाणी ग्राम सुरक्षा दले स्थापन करुन त्या माध्यमातून युवकांच्या मदतीने गस्त घालण्याचे काम सुरु असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे यांनी सांगितले.
तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा…
पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…
सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…
बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…
सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…