मुंबई: लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी मध्ये पाचव्या आठवड्याचा ‘वीकेंड का वार’ प्रेक्षकांसाठी धक्कादायक ठरणार असल्याची चर्चा रंगली आहे. गेल्या आठवड्यात घरातून दिव्या शिंदे हिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर प्रेक्षकांच्या मतांनुसार ओमकार राऊतचीही एक्झिट झाली. सलग दोन सदस्य घराबाहेर गेल्यानंतर या आठवड्यात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.घरातील सहा सदस्य नॉमिनेशनमध्ये असल्याने यावेळी पुन्हा एव्हिक्शन होणार का, अशी चर्चा सुरू होती. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टनुसार या आठवड्यातही डबल एव्हिक्शन झाल्याची माहिती समोर येत आहे.
आयुष संजीवचा प्रवास संपला?
पाचव्या आठवड्यात आयुष संजीव फारसा दिसला नाही. घरात राखी सावंत यांच्या एन्ट्रीनंतर अनेक सदस्य पुन्हा अॅक्टिव्ह झाले असताना आयुष मात्र कॅमेऱ्यासमोर कमीच दिसला. कोणत्याही टास्कमध्ये त्याचा ठळक सहभाग नव्हता, तसेच भांडणांपासूनही तो दूर राहिला. त्याची प्रकृतीही ठीक नसल्याची चर्चा होती. त्यामुळे प्रेक्षकांनी सोशल मीडियावर त्याला गेममधून बाहेर काढण्याची मागणी केली होती.या पार्श्वभूमीवर आयुष संजीवची या वीकेंडला घरातून एक्झिट झाल्याची चर्चा रंगली आहे.
करण सोनावणेही बाहेर?
डबल एव्हिक्शन असल्याने दुसरा सदस्य कोण, याची उत्सुकता वाढली आहे. सोशल मीडिया स्टार करण सोनावणे याचे नाव समोर येत असून तोही घराबाहेर गेल्याची चर्चा आहे. करणचा प्रवास इतक्या लवकर संपल्याची बातमी ऐकून त्याचे चाहते निराश झाले आहेत.मात्र काही जणांनी करणला ‘सिक्रेट रूम’मध्ये ठेवण्यात आलं असावं, असा अंदाजही व्यक्त केला आहे. त्यामुळे तो खरंच बाहेर गेला की शोमध्ये काही मोठा ट्विस्ट आहे, याबाबत संभ्रम कायम आहे.
अधिकृत घोषणा बाकी
करण आणि आयुष यांच्या एव्हिक्शनबाबत कलर्स मराठी किंवा बिग बॉस मराठी कडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. रविवारी ‘भाऊच्या धक्क्यावर’ होस्ट रितेश देशमुख नेमकी कोणाची एक्झिट झाली हे जाहीर करणार आहेत.
आता खरंच डबल एव्हिक्शन झालं आहे का? आयुषचा प्रवास इथेच थांबला का? आणि करण सोनावणे घराबाहेर गेला की सिक्रेट रूममध्ये आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना रविवारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान झालेल्या फायरींग प्रकरणातील दोन मुख्य…
संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी घटना जेजुरी: जेजुरी येथे दर्शनासाठी आलेली तीन वर्षांची चिमुकली हरवल्याने काही…
शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…
नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…
शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…
सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…