CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 75?
मुंबई: ‘बिग बॉस’ हा असा खेळ आहे, ज्यात क्षणाक्षणाला समीकरणे बदलतात. मैत्रीचे रूपांतर शत्रुत्वात होते, तर शत्रूही कधी मित्र बनतात. त्यामुळेच या खेळात अनपेक्षित ट्विस्ट पाहायला मिळतात. सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वातही असाच एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे.
घरात सध्या तीन गट स्पष्टपणे दिसत असून त्यातील ‘काटा गँग’मध्ये राकेश बापट, तन्वी कोलते, दीपाली सय्यद आणि प्रभू शेळके यांचा समावेश आहे. सुरुवातीपासून प्रभू आणि तन्वी यांच्यातील भाऊ-बहीणसारखे नाते प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होते. मात्र, आता याच नात्यात दुरावा निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
प्रोमोमध्ये काय दिसले?
कलर्स मराठी वाहिनीने नुकताच सोशल मीडियावर एक नवीन प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये किचन एरियात तन्वी, प्रभू, राखी आणि इतर सदस्य दिसत आहेत.
राखी सावंत प्रभूला म्हणताना दिसते, “तू इथे पदर पकडायला आला नाहीस. तू इथे स्पर्धक आहेस. स्वतःसाठी खेळ.” त्यावर तन्वी राखीवर नाराजी व्यक्त करताना दिसते. प्रभू म्हणतो, “एकही निर्णय घेतला जात नव्हता. मी एकटा काय करू?” या वक्तव्यानंतर तन्वीला राग येतो.
तन्वी स्पष्ट शब्दांत म्हणते, “तुला वाटत असेल की तू पदर पकडून असतोस, तर उद्यापासून माझा पदर पकडू नकोस.” यानंतर प्रभू रडताना दिसतो. राखी त्याला समजावत म्हणते, “तू तिला कॅप्टन बनवलं आहेस. तुझा वापर करतात.” पुढे तीही भावूक होत “सॉरी, मी तुझ्यासाठी काही करू शकत नाही,” असे म्हणताना दिसते.हा प्रोमो शेअर करताना वाहिनीने “डॉन सोडणार का तन्वीची साथ?” अशी कॅप्शन दिली आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
प्रोमो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे. काहींनी राखीच्या खेळाचे कौतुक केले आहे. “राखी प्रत्येकाचे डोळे उघडत आहे”, “राखी काट्यात राहून काट्यांचा काटा काढते”, “राखी कोणाचीच नसते”, “तन्वीनं त्याचा प्यादा म्हणून वापर केला”, “कडक! राखी खूप छान खेळत आहे”, अशा प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
पुढे काय?
दरम्यान, तन्वी नुकतीच घराची कॅप्टन बनली आहे. त्यामुळे तिच्या नेतृत्वाखाली ‘काटा गँग’ टिकणार का, की प्रभू वेगळी वाट धरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या भागात घरातील समीकरणे आणखी बदलण्याची शक्यता असून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी घटना जेजुरी: जेजुरी येथे दर्शनासाठी आलेली तीन वर्षांची चिमुकली हरवल्याने काही…
शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…
नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…
शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…
सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…
रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत…