मनोरंजन

‘धर्मवीर’साठी १७ पुरस्कार मिळाले, पण राष्ट्रीय पुरस्कार हुकल्याची खंत; प्रसाद ओक

मुंबई: धर्मवीर आणि धर्मवीर २ या दोन्ही मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या मनात जबरदस्त छाप पाडली. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या चित्रपटांची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. निर्माते मंगेश देसाई यांनी या चित्रपटांची निर्मिती केली.

या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांची भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांच्या दमदार अभिनयासाठी त्यांना त्या वर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे तब्बल १७ पुरस्कार मिळाले. विशेष म्हणजे, ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स इंग्लंड रेकॉर्ड’मध्ये त्यांच्या या कामगिरीची नोंद करण्यात आली आहे.

“राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा होता”

नुकत्याच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत प्रसाद ओक यांनी मनातील खंत व्यक्त केली. ते म्हणाले, “‘धर्मवीर’ चित्रपटासाठी मला १७ पुरस्कार मिळाले असले तरी अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार हुकल्याची थोडी खंत आहे. दिग्दर्शक म्हणून मला ‘कच्च लिंबू’साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला; पण अभिनेता म्हणूनही तो मान मिळावा, अशी इच्छा आहे. भविष्यात अजून चांगलं काम करून राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्याचा माझा प्रयत्न असेल.”

ऑस्करबाबत बोलताना ते म्हणाले की, “ऑस्करची फारशी अपेक्षा नाही; मात्र आपल्या देशातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्याची नक्कीच इच्छा आहे.”

‘धर्मवीर ३’बाबत काय म्हणाले?

धर्मवीर ३ संदर्भात विचारले असता प्रसाद ओक म्हणाले की, अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. “मंगेश देसाई यांच्या मनात असेल, तर ते योग्य वेळी घोषणा करतील. सध्या प्रवीण तरडे ‘देऊळ बंद २’मध्ये व्यग्र आहेत, तर मंगेश देसाई इतर प्रकल्पांमध्ये गुंतले आहेत. मात्र ‘धर्मवीर ३’ व्हावा, अशी माझी इच्छा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

आगामी चित्रपटांची उत्सुकता

प्रसाद ओक यांनी आगामी प्रकल्पांबद्दलही माहिती दिली. ‘महापरिनिर्वाण’ या मोठ्या चित्रपटात ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्याशिवाय ‘एफआयआर ४६९’ आणि ‘वारी’ हे चित्रपटही प्रदर्शित होणार आहेत.

यासोबतच दिग्दर्शक म्हणून पुढील वर्षी ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या बायोपिकचे काम सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच ‘भद्रकाली’ या चित्रपटाचं कामही लवकरच सुरू होणार आहे.

अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून प्रसाद ओक आगामी काळात विविध प्रकल्पांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

3 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

3 तास ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

3 तास ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

3 तास ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

5 तास ago

आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीमार थांबवा; महाराष्ट्रात पोलीस राज खपवून घेणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पेपरफुटी प्रकरणावर न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेला कथित लाठीमार अन्यायकारक असून महाराष्ट्रात…

5 तास ago