मनोरंजन

‘मी जिंकून घेईन सारं!’ १६ मार्चपासून सायं. ७ वाजता; कलर्स मराठीवर नव्या मालिकेची एंट्री

मुंबई: मराठी छोट्या पडद्यावर नव्या मालिकांची रेलचेल सुरू असताना ‘मी जिंकून घेईन सारं!’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. १६ मार्चपासून सायंकाळी ७ वाजता ही मालिका ‘कलर्स मराठी’वर प्रसारित होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असून त्यांच्या दमदार अभिनयाची पुन्हा एकदा प्रेक्षकांना मेजवानी मिळणार आहे. मुख्य भूमिकेत लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी तांबट दिसणार आहे. जान्हवी यापूर्वी ‘लक्ष्मी निवास’ आणि ‘अबोल प्रितीची अजब कहाणी’ या मालिकांमधून घराघरात पोहोचली आहे.

तसेच अभिनेता अमित रेखी, संचित चौधरी आणि दिशा दानडे यांचीदेखील मालिकेत महत्त्वाची भूमिका असणार आहे. खलनायिकेच्या भूमिकेत अभिनेत्री अमृता फडके झळकणार असून तिच्या व्यक्तिरेखेबाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

सध्या सायंकाळी ७ वाजताच्या स्लॉटला ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका सुरू आहे. मात्र नव्या मालिकेच्या आगमनामुळे वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सायंकाळी साडेसहाला प्रसारित होणारी ‘इंद्रायणी’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून २१ फेब्रुवारीला तिचं शूटिंग पूर्ण झालं आहे.

दरम्यान, ‘मी जिंकून घेईन सारं!’च्या पहिल्या प्रोमोला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत असून आता मालिकेला प्रत्यक्ष प्रसारणानंतर प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर! वरूडे खून प्रकरणाचा 36 तासांत उलगडा; मुलगा ताब्यात; कारण समोर…

शिरूर : शिरूर तालुक्यातील वरूडे गावात घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीच्या निर्घृण हत्येचा उलगडा अवघ्या 36 तासांत…

32 मिनिटे ago

आचारसंहितेदरम्यान घेतलेल्या निर्णयांवर काँग्रेसचा सवाल; निवडणूक आयोगाने चौकशी करावी; अनंत गाडगीळ

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…

2 दिवस ago

शेतकरी कर्जमाफी फसवी; सर्वपक्षीय बैठक बोलवा; विजय वडेट्टीवार

नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…

2 दिवस ago

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर समर्थ पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व; सर्व १४ जागांवर विजय

मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…

2 दिवस ago

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त राज्यभर जनजागृती व नेत्र चिकित्सा शिबिरे; चंद्रकांत पाटील

मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…

2 दिवस ago

एनडीए बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापन दिन ११ जूनला

षण्मुखानंद सभागृहात दुपारी २ वाजता होणार कार्यक्रम; संघटन विस्ताराला प्राधान्य मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०…

2 दिवस ago