मुंबई: मराठी छोट्या पडद्यावर नव्या मालिकांची रेलचेल सुरू असताना ‘मी जिंकून घेईन सारं!’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. १६ मार्चपासून सायंकाळी ७ वाजता ही मालिका ‘कलर्स मराठी’वर प्रसारित होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असून त्यांच्या दमदार अभिनयाची पुन्हा एकदा प्रेक्षकांना मेजवानी मिळणार आहे. मुख्य भूमिकेत लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी तांबट दिसणार आहे. जान्हवी यापूर्वी ‘लक्ष्मी निवास’ आणि ‘अबोल प्रितीची अजब कहाणी’ या मालिकांमधून घराघरात पोहोचली आहे.
तसेच अभिनेता अमित रेखी, संचित चौधरी आणि दिशा दानडे यांचीदेखील मालिकेत महत्त्वाची भूमिका असणार आहे. खलनायिकेच्या भूमिकेत अभिनेत्री अमृता फडके झळकणार असून तिच्या व्यक्तिरेखेबाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
सध्या सायंकाळी ७ वाजताच्या स्लॉटला ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका सुरू आहे. मात्र नव्या मालिकेच्या आगमनामुळे वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सायंकाळी साडेसहाला प्रसारित होणारी ‘इंद्रायणी’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून २१ फेब्रुवारीला तिचं शूटिंग पूर्ण झालं आहे.
दरम्यान, ‘मी जिंकून घेईन सारं!’च्या पहिल्या प्रोमोला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत असून आता मालिकेला प्रत्यक्ष प्रसारणानंतर प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…
मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…
मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी राष्ट्रपिता Mahatma Gandhi यांच्या हत्येचे समर्थन…
मुंबई: मुंबई शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सुप्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार (वय ७५ वर्षे) यांचे दीर्घ…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…