मनोरंजन

‘मी जिंकून घेईन सारं!’ १६ मार्चपासून सायं. ७ वाजता; कलर्स मराठीवर नव्या मालिकेची एंट्री

मुंबई: मराठी छोट्या पडद्यावर नव्या मालिकांची रेलचेल सुरू असताना ‘मी जिंकून घेईन सारं!’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. १६ मार्चपासून सायंकाळी ७ वाजता ही मालिका ‘कलर्स मराठी’वर प्रसारित होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असून त्यांच्या दमदार अभिनयाची पुन्हा एकदा प्रेक्षकांना मेजवानी मिळणार आहे. मुख्य भूमिकेत लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी तांबट दिसणार आहे. जान्हवी यापूर्वी ‘लक्ष्मी निवास’ आणि ‘अबोल प्रितीची अजब कहाणी’ या मालिकांमधून घराघरात पोहोचली आहे.

तसेच अभिनेता अमित रेखी, संचित चौधरी आणि दिशा दानडे यांचीदेखील मालिकेत महत्त्वाची भूमिका असणार आहे. खलनायिकेच्या भूमिकेत अभिनेत्री अमृता फडके झळकणार असून तिच्या व्यक्तिरेखेबाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

सध्या सायंकाळी ७ वाजताच्या स्लॉटला ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका सुरू आहे. मात्र नव्या मालिकेच्या आगमनामुळे वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सायंकाळी साडेसहाला प्रसारित होणारी ‘इंद्रायणी’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून २१ फेब्रुवारीला तिचं शूटिंग पूर्ण झालं आहे.

दरम्यान, ‘मी जिंकून घेईन सारं!’च्या पहिल्या प्रोमोला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत असून आता मालिकेला प्रत्यक्ष प्रसारणानंतर प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

हेडऐवजी टेलपासून कालव्याचे अस्तरीकरण; शिरूरच्या शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप, आंदोलनाचा इशारा

आंबळे ग्रामस्थांचा चासकमान पाटबंधारे विभागाला इशारा; हेडपासून काम सुरू न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार…

43 मिनिटे ago

उबाठा गटाला मोठा धक्का! अहिल्यानगर, पुणे, नांदेडमधील शेकडो पदाधिकारी शिंदे यांच्या शिवसेनेत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात जाहीर पक्षप्रवेश; विकासाच्या राजकारणावर विश्वास व्यक्त ठाणे: राज्यातील राजकीय…

7 तास ago

एकनाथ शिंदेंची बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत उद्धव-राज-राहुल गांधींवर टीका

मुंबई: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे श्रेय घेण्याचा विरोधकांचा प्रयत्न म्हणजे "बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना" असल्याची टीका…

7 तास ago

शिरूर तालुक्यात गोळीबार करुन दहशत माजविणाऱ्या योगेश मचाले टोळीवर ‘मोक्का’…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील क्रिकेट स्पर्धेच्या वादातून बेकायदेशीर पिस्तुलाने गोळीबार…

7 तास ago

ठाणेच्या वाहतुकीला मोठा दिलासा; २०० कोटींच्या तीन हात नाका प्रकल्पाचे भूमिपूजन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शुभारंभ; दीड वर्षांत वाहतूक कोंडी कमी करण्याचे उद्दिष्ट, जलपुरवठा व क्रीडा…

7 तास ago

६५९ पदांची भरती म्हणजे तरुणांची क्रूर थट्टा’; मिंधे सरकारवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

भरतीच्या नावाखाली केवळ घोषणांचा पाऊस; NET-SET, Ph.D. धारकांची फसवणूक होत असल्याचा ॲड. अमोल मातेले यांचा…

7 तास ago