मुंबई: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनला आता चांगलीच रंगत आली असून लवकरच ५० दिवसांचा टप्पा पूर्ण होत आहे. यंदाच्या सीझनमध्ये पहिल्यांदाच एक वेगळा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. या आठवड्यात नेहमीप्रमाणे रविवारी नव्हे, तर शनिवारीच एलिमिनेशन होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या आठवड्यात राकेश, रोशन, राखी आणि प्राजक्ता हे चार जण घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले होते. त्यापैकी रोशन भजनकरचा ‘बिग बॉस’मधील प्रवास संपणार असल्याची चर्चा सध्या जोरात आहे. मात्र, याचबरोबर प्रेक्षकांसाठी आणखी एक मोठा धक्का तयार असल्याचं बोललं जात आहे.
घरात येणार तीन वाइल्ड कार्ड स्पर्धक?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या माहितीनुसार, एकूण तीन वाइल्ड कार्ड स्पर्धक घरात एन्ट्री घेणार आहेत. या तिन्ही नावांभोवती सध्या प्रचंड चर्चा रंगली आहे.
१) अभिनेत्री रेवा कौरसे
‘टेलीचक्कर’च्या रिपोर्टनुसार रेवा कौरसे ‘बिग बॉस मराठी’मध्ये प्रवेश करणार आहे. तिने हिंदी मालिकांमधून आपली छाप पाडली आहे. विशेषतः दीवानियात आणि प्यार का पहला अध्याय: शिव शक्ती या मालिकांमधील तिच्या भूमिकांमुळे ती चर्चेत आली.
२) संस्कृती साळुंखे
रिअॅलिटी शोजमधून घराघरांत पोहोचलेली संस्कृती साळुंखे हिचं नावही वाइल्ड कार्डसाठी चर्चेत आहे. झी मराठीवरील जाऊ बाई गावात या कार्यक्रमामुळे ती विशेष प्रसिद्ध झाली. ‘पापा की परी’ म्हणून ओळखली जाणारी संस्कृती घरात गेल्यावर नेमका कसा खेळ खेळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
३) संकेत पाठक
स्टार प्रवाहचा लोकप्रिय अभिनेता संकेत पाठक हाही घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार असल्याची चर्चा आहे. त्याने लग्नाची बेडी आणि छत्रीवाली या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तसेच ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या चित्रपटातही तो झळकला आहे.
अधिकृत घोषणा अद्याप बाकी
दरम्यान, या तिन्ही स्पर्धकांच्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीबाबत अद्याप कलर्स मराठी किंवा ‘बिग बॉस मराठी’कडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, जर ही तिहेरी एन्ट्री खरी ठरली, तर घरातील समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.आता येत्या काही दिवसांत नेमका कोण घरात प्रवेश करणार आणि कोणाला निरोप घ्यावा लागणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…
मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…
मुंबई: जनगणनेचा अहवाल २०२७ मध्ये पूर्ण होणार असताना, वर्षभरात उपलब्ध होणाऱ्या ताज्या आकडेवारीऐवजी ११ वर्षांपूर्वीच्या…
मुंबई: राज्यातील महिला सुरक्षेशी संबंधित शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून महिलांना…
बिहारच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, ते पाहून जुन्या नाटककारांना देखील लाज वाटावी! पडद्यावर…
मुंबई: आरती आर्ट अकादमी (मुंबई), वेताळ प्रतिष्ठान (वेंगुर्ले) आणि अखिल भारतीय दशावतारी नाट्य परिषद व…