crime
शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील करंजुलेनगर येथे अत्यंत किरकोळ कारणावरुन सुरु झालेला वाद थेट मारामारीत परिवर्तित झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लोखंडी खुट्या ठोकण्याच्या कारणावरुन संतापलेल्या तिघांनी एका तरुणासह त्याच्या आईवर विटा आणि हातोडीने जीवघेणा हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अमोल बाळासाहेब करंजुले (वय २९, रा. करंजुलेनगर, ता. शिरुर) या युवकाने शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी ज्ञानदेव सिताराम करंजुले, बबई सिताराम करंजुले आणि किशोर करंजुले (सर्व रा. करंजुलेवस्ती, ता. शिरुर) यांनी एकत्रितपणे हा हल्ला केला.
फिर्यादी अमोल करंजुले हे आपल्या घरासमोर लोखंडी खुट्या ठोकण्याचे काम करत असताना आरोपींनी “या ठिकाणी खुट्या लावायच्या नाहीत” असा आक्षेप घेत वाद घातला. सुरुवातीला केवळ बोलाचालीत असलेला वाद काही क्षणांतच चिघळला आणि आरोपींनी शिवीगाळ करत दमदाटी सुरु केली.
यानंतर तिघांनी एकत्र येत अमोल करंजुले आणि त्यांच्या आई शोभा यांना लक्ष्य करत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. परिस्थिती अधिकच गंभीर करत आरोपी ज्ञानदेव करंजुले याने घटनास्थळी पडलेले विटांचे तुकडे उचलून अमोल याच्या डाव्या पायावर फेकून मारले. तसेच दुसरा विटेचा तुकडा थेट त्यांच्या आई शोभा यांच्या दिशेने फेकल्याने त्यांना त्या डोक्यात लागल्याने त्या जखमी झाल्या.
या भांडणाची तीव्रता इतकी वाढली की, आरोपी ज्ञानदेव करंजुले याने अमोल याच्या हातातील हातोडी हिसकावून घेतली आणि त्या हातोडीच्या लोखंडी दांडक्याने त्यांच्या पाठीवर जोरदार मारहाण करत गंभीर दुखापत केली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
या घटनेनंतर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक नसल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, किरकोळ कारणावरुन एवढ्या टोकाला गेलेल्या या वादामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास शिरुर पोलिस ठाण्याचे पोलीस हवालदार विशाल कोथळकर करत आहेत.
पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; दोन टोळ्यांतील ४ सराईत गुन्हेगार जेरबंद
शिरुर तालुक्यासाठी 1100 कोटींच्या सिंचन प्रकल्पाला गती; सिंचन भवनात महत्त्वपूर्ण आढावा बैठक
शिरुर तालुक्यात लाखोंची फसवणुक; विश्वासू कर्मचाऱ्यानेच मालकाला घातला गंडा
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…
मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…
मुंबई: जनगणनेचा अहवाल २०२७ मध्ये पूर्ण होणार असताना, वर्षभरात उपलब्ध होणाऱ्या ताज्या आकडेवारीऐवजी ११ वर्षांपूर्वीच्या…
मुंबई: राज्यातील महिला सुरक्षेशी संबंधित शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून महिलांना…
बिहारच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, ते पाहून जुन्या नाटककारांना देखील लाज वाटावी! पडद्यावर…
मुंबई: आरती आर्ट अकादमी (मुंबई), वेताळ प्रतिष्ठान (वेंगुर्ले) आणि अखिल भारतीय दशावतारी नाट्य परिषद व…