मुख्य बातम्या

दरेकरवाडीतील उद्घाटन फलक चोरणाऱ्यावर गुन्हे दाखल करा…

ग्रामपंचायत सदस्याची ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे लेखी मागणी

शिक्रापूर (शेरखान शेख): दरेकरवाडी (ता. शिरुर) येथील गावासाठी शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली असताना सदर कामाचे दोन वेगवेगळे भूमिपूजन होऊन तीन वेगवेगले फलक लावण्यात आले. मात्र ग्रामपंचायतने प्रथम लावलेला फलक चोरीला गेल्याने गायब झालेले उद्घाटन फलक चोरणाऱ्याची चौकशी करुन पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ दरेकर यांनी केली आहे.

दरेकरवाडी (ता. शिरुर) ग्रामपंचायत साठी शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या नावाचा फलक लावून सदर योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी सदर फलक काढून आमदारांच्या नावाचा फलक लावत पुन्हा आमदारांच्या हस्ते भूमिपूजन केले. मात्र त्यानंतर गावामध्ये अनेकानानी संतप्त भावना व्यक्त केल्याने पुन्हा तिसरा फलक लावण्यात आला. त्यामुळे सदर कामासाठी श्रेय घेण्याबाबतच्या सर्व घटना अल्स्याचे उघड झाले.

मात्र ग्रामपंचायतने प्रथम लावलेला फलक गायब झाला असल्यामुळे सदर प्रकारांची सखोल चौकशी करुन ग्रामविकास अधिकारी यांनी फलक चोरणाऱ्या व्यक्तीवर पोलीस स्टेशनमध्ये मध्ये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ दरेकर यांनी ग्रामविकास अधिकारी सोमनाथ घाडगे यांच्याकडे केली आहे.

दरेकरवाडी मध्ये सदर कामाचे उद्घाटन झाले मात्र त्याबाबतचा फलक ठेकेदाराने बनवून आणलेला अल्स्याने त्याबाबतचे रेकॉर्ड आपल्याकडे नाही. मात्र याबाबत आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी सोमनाथ घाडगे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

12 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

12 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

12 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

12 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

13 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

13 तास ago