शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. येथील ग्रामपंचायत कर्मचारी भरत पोपट गायकवाड याला लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, कान्हूरमेसाई येथील तक्रारदाराच्या जागेवर काही व्यक्तींनी अतिक्रमण करुन घर उभारले होते. या प्रकरणात संबंधितांनी ग्रामसेवकाकडून नियमबाह्य पद्धतीने ८-अ उतारा तयार करुन घेतल्याचा आरोप आहे. याबाबत न्याय मिळावा म्हणून तक्रारदाराने शिरुर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. या अर्जाची चौकशी करुन अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी भरत गायकवाड याने तक्रारदाराकडे थेट १० ते १५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
इतकेच नव्हे, तर ही लाच स्वतःसाठी आणि ग्रामसेवकासाठी असल्याचेही त्याने स्पष्ट केले होते, अशी माहिती तपासात उघड झाली आहे. या मागणीने संतप्त झालेल्या तक्रारदाराने पुणे येथील लाचलुचपत विभागाकडे (ACB) तक्रार दाखल केली. ६ जानेवारी २०२६ रोजी एसीबीने सापळा रचून पडताळणी केली असता, गायकवाड याने स्वतःसाठी आणि ग्रामसेवक घासले यांच्या नावाने २ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. यानंतर काल बुधवार दि १ एप्रिल २०२६ रोजी एसीबीने कारवाई करत गायकवाडला अटक केली. सायंकाळी सातच्या सुमारास ही कारवाई पार पडली असून, शिक्रापूर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे करत आहेत.
दरम्यान, ग्रामपंचायतीतच लाचखोरीचे जाळे उघड झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. “सामान्य नागरिकांच्या न्यायासाठी असलेली यंत्रणा जर लाचेच्या विळख्यात अडकली असेल, तर सर्वसामान्यांनी न्याय कुठे मागायचा…?” असा सवाल आता नागरिकांकडुन उपस्थित केला जात आहे. या कारवाईमुळे कान्हूरमेसाई ग्रामपंचायतीतील इतर व्यवहारांवरही संशयाची सावली पडली असून, एसीबी आणखी धागेदोरे उकलणार का…? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…
शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…
सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…
रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत…
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत असून त्यांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कारच दिला…
मुंबई: राजकारणाच्या मैदानात कधी तलवारी चालतात, कधी घोषणांचा पाऊस पडतो; पण महाराष्ट्रात आता सरकारी जाहिरातींच्या…