मुख्य बातम्या

आंबेगावचा बिहार झालाय का…? पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावर गावगुंडांचा हल्ला

शिरुर (तेजस फडके): समर्थ भारत या वृत्तपत्राच्या संपादिका स्नेहा बारवे आणि त्यांचे सहकारी पत्रकार समीर राजे यांना मंचर येथील एका राजकीय पुढाऱ्याने आणि त्यांच्या नातेवाईकांनी अश्लील शिवीगाळ, धक्काबुक्की करत, मारहाण केली असून याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यास या गुंडांनी पत्रकार स्नेहा बारवे आणि समोर राजे यांना जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिलीये. या घटनेने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून आंबेगाव तालुक्याचा बिहार झालाय का असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.

मंचर शहरातील एस कॉर्नर परिसरात असणाऱ्या नाविन्य रेसिडेन्सी या इमारतीच्या डेव्हलपरने त्याच्या अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी केल्याचा संशय, खेड वरून मीटर मधे हेराफेरी करणाऱ्या इसमांना बोलावून मीटर बायपास, वीज चोरी आदी गोष्टी करत असल्याचे चित्रीकरण केल्याचा संशय, तसेच नाविन्य रेसिडेन्सी या इमारतीमधील फ्लॅटची विक्री करून सदर ठिकाणी सोसायटीची नोंदणी न करता सदनिका धारकांची फसवणूक होत असून, ही फसवणूक संबंधित पत्रकार उघड करतात की काय असा संशय मनात ठेवून संतापून रामदास बबन जाधव, तनुजा बबन जाधव, अमोल आहेरकर आणि तुषार आहेरकर यांनी स्नेहा बारवे यांना अश्लील शिवीगाळ, धक्काबुक्की करत जीवे ठार मारण्याची धमकी दिलीये. यासोबतच रामदास जाधव या इसमाने पत्रकार स्नेहा बारवे यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात पत्रकार स्नेहा बारवे यांच्या हातावर जोरात फटका देखील बसला आहे.

 

या गुंडगिरी करणाऱ्या इसमांवर मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, स्नेहा बारवे आणि समीर राजे यांच्यासारखे निर्भीड पत्रकारच जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य माणसाची काय अवस्था असेल असा सवाल आता विचारला जाऊ लागला असून, या गावगुंडांना नक्की कोणाचा वरदहस्त आहे आणि यांचा आका नक्की कोण हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

14 तास ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

20 तास ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

2 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

2 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

2 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

2 दिवस ago