पाबळ (सुनिल जिते): गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या कान्हूर मेसाई परिसरात रविवारी दुपारनंतर जोरदार पावसाने दमदार हजेरी लावली. सुमारे तासभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाण्याचे प्रवाह वाहू लागले, तर शेतशिवारात सर्वत्र पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.यंदाच्या मान्सूनच्या सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र या दमदार पावसामुळे खरीप हंगामाला नवसंजीवनी मिळाली असून मका, बाजरी, सोयाबीन, तूर आणि इतर पिकांच्या पेरण्यांना वेग येणार आहे. पावसामुळे विहिरी, तलाव आणि ओढ्यांच्या पाणीपातळीतही वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला. लहान मुलांनी पावसाचा मनमुराद आनंद लुटला, तर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.परिसरातील शेतकऱ्यांनी या पावसाचे स्वागत करत, आगामी काळातही अशीच सातत्यपूर्ण पावसाची साथ मिळाल्यास खरीप हंगाम चांगला होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
मुंबई: शिवसेना महिला सेनेने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मुंबई पोलीस…
पुणे: छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) ही केवळ शासकीय योजना…
शिरुर (तेजस फडके) सध्या शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी चालु असुन एका बैठकीदरम्यान…
मुंबई: टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत गंभीर आणि संतापजनक असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार व…
रायगड: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर रायगडावरून महाडकडे परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
शिक्रापुर (ओमकार भोरडे) पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील सणसवाडी चौक ते एमआयडीसी फाटा दरम्यान एका प्रवाशाला रिक्षातुन प्रवास…