न्हावरे (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमोणे गावावर मध्यरात्री दुःखाचा डोंगर कोसळला असुन न्हावरे चौफुला रोडवरील नलगे वस्ती दरम्यान झालेल्या भीषण अपघातात काळे कुटुंबातील दोघांचा तर त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकाचा जागीच मृत्यू झाला असुन एक जण गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत आहे. या दुर्घटनेमुळे निमोणे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास चारचाकी कार आणि ट्रकची समोरासमोर धडक बसल्याने हा अपघात घडला. धडक इतकी जबरदस्त होती की वाहनाचे मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिघांना मृत घोषित केले, तर एका गंभीर जखमीवर उपचार सुरु असल्याचे समजते.
या अपघातात पवन राजहंस काळे (वय 38) आराध्या पवन काळे (वय 9) आणि पवन काळे यांचे मेहुणे बाळासाहेब नागवडे (वय 38) यांचे निधन झाले. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वेग, रस्त्याची परिस्थिती किंवा इतर तांत्रिक कारणांचा तपास पोलीस करत आहेत. पंचनामा करुन पुढील कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
या घटनेमुळे निमोणे गावात शोककळा पसरली आहे. काळे कुटुंब हे सामाजिकदृष्ट्या सक्रिय आणि सर्वपरिचित कुटुंब म्हणून ओळखले जाते. अचानक झालेल्या या दुर्दैवी घटनेने ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, नागरिकांकडून न्हावरे चौफुला रोडवरील वाढता वेग, अपुरी प्रकाशव्यवस्था आणि रस्त्यावरील धोकादायक वळणांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे.
(हि बातमी अद्याप प्राथमिक माहितीनुसार असून अधिकृत तपशील आल्यावर सविस्तर बातमी प्रसिद्ध करण्यात येईल.)
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…
मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…
पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…
अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…
मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…
जळगाव: अन्नपदार्थांतील भेसळ, विषारी दारूच्या घटना, शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, मराठी माध्यमाच्या शाळांसमोरील आव्हाने आणि अनुदानित…