शिंदोडी (तेजस फडके) करडे ते कारेगाव हा मुख्य रस्ता सध्या अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल ३०० पेक्षा अधिक खड्ड्यांनी हा मार्ग विद्रूप झाला असून नागरिक आणि वाहनचालकांचे हाल होत आहेत.
दररोज या रस्त्याने रांजणगाव औद्योगिक वसाहतीत अनेक कामगार प्रवास करतात. मात्र प्रत्येक दहा-पंधरा फूटांवर खोल खड्डे निर्माण झाल्याने या रस्त्यावर प्रवास करणे धोकादायक झाले आहे. यंदा मे महिन्यात पाऊस सुरु झाला आणि ऑक्टोबर महिन्यात बंद झाला. गेले सहा महिने या रस्त्यावरुन जाणाऱ्या प्रत्येक वाहनाचं चाक एखाद्या खड्ड्यात आदळल्याशिवाय पुढे जातच नाही.
स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत तक्रारी केल्या, मात्र आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. करडे ते कारेगाव रस्त्याच्या सहा किलोमीटर अंतरासाठी करडे ते बाभुळसर शिव या ४ किमी अंतरावर तब्बल २४० खड्डे पडले आहेत. तर बाभुळसर शिव ते कारेगाव या २ किमी अंतरावर तब्बल ६० खड्डे पडले आहेत. या दोन्ही रस्त्याचे काम दोन वेगवेगळ्या ठेकेदारांनी केले आहे.
या रस्त्याच्या निकृष्टपणाबाबत बोलताना शेतकरी संघटनेचे बापुसाहेब शिवले म्हणाले, करडे-कारेगाव या ६ किमी रस्त्याचे काम सुरवातीपासुनच खराब झाले आहे. रस्त्यात खड्डे आहेत कि खड्यात रस्ता आहे हेच कळत नाही. प्रशासन मात्र परस्परांवर जबाबदारी ढकलण्यातच व्यस्त आहे असे त्यांनी सांगितले.
याबाबत शिरूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बाबासाहेब गाडेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्ही या रस्त्याची पाहणी केली असुन लवकरच या रस्त्याचे काम सुरु करण्यात येणार आहे.
Video; ठेकेदाराचा अजब कारभार; भर पाऊसात करडे-कारेगाव रस्त्याची डागडुजी…?
मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…
मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…
शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…
मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…
मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…