शिरूर (अरुणकुमार मोटे): शौर्य, निष्ठा आणि सेवाभाव यांचा उत्कृष्ट संगम घडवून आणत शिरूर पोलिस दलातील दोन अधिकाऱ्यांनी संपूर्ण शिरूर तालुक्याचा अभिमान वाढवला आहे. शिरूर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे आणि पोलीस उपनिरीक्षक हनमंत नकाते यांना नक्षलग्रस्त भागात केलेल्या उल्लेखनीय, धाडसी व प्रामाणिक सेवेबद्दल विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे.
पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी 2021 ते 2024 या कालावधीत गोंदिया या नक्षलग्रस्त भागात कार्य करताना, गुन्हेगारी आटोक्यात आणणे, जनजागृती करणे व स्थानिक युवकांना पोलिस भरतीसाठी प्रेरित करण्याची महत्वपूर्ण कामगिरी केली. यापूर्वी 2010 ते 2013 दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील केशोरी पोलीस स्टेशनमध्ये अशाच धाडसी सेवेसाठी त्यांना प्रथमच विशेष सेवा पदक मिळाले होते. त्यामुळे केंजळे हे दुसऱ्यांदा या मानाच्या पदकाने सन्मानित होत आहेत.
सन 2024 मध्ये शिरूरचे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी विविध गुन्ह्यांची उकल करून नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. “ज्या जबाबदाऱ्या मिळतात, त्या प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडणे हीच माझी खरी ताकद,” असे त्यांनी पदकाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.
शिरूर पोलीस स्टेशनमधील पोलिस उपनिरीक्षक हनमंत नकाते यांनी नक्षलग्रस्त भागात कार्यरत असताना कठीण परिस्थितीतही चिकाटी, धैर्य आणि सेवाभावाने काम केले. स्थानिकांमध्ये विश्वास निर्माण करून कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली, ज्याची दखल घेऊन त्यांनाही विशेष सेवा पदकाचा बहुमान मिळाला आहे.
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी विशेष सेवा पदकप्राप्त अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली असून त्यात शिरूरमधील केंजळे आणि नकाते यांची नावे झळकली. एकाच वेळी एका पोलीस स्टेशनमधील दोन अधिकाऱ्यांना असा सन्मान मिळणे ही दुर्मीळ घटना ठरली आहे. या दोघांच्या कार्यगौरवामुळे संपूर्ण शिरूरमध्ये आनंद आणि अभिमानाचा माहोल असून, विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…
मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…
मुंबई: जनगणनेचा अहवाल २०२७ मध्ये पूर्ण होणार असताना, वर्षभरात उपलब्ध होणाऱ्या ताज्या आकडेवारीऐवजी ११ वर्षांपूर्वीच्या…
मुंबई: राज्यातील महिला सुरक्षेशी संबंधित शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून महिलांना…
बिहारच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, ते पाहून जुन्या नाटककारांना देखील लाज वाटावी! पडद्यावर…