रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): आपल्या संस्कृतीमध्ये मुळातच पुर्वीपासूनच महिलांना देवी आणि मातेचे स्थान दिलेले आहे. मात्र परदेशात महिलांना अतिशय हीन वागणुक दिली जात होती. तसेच त्यांना मतदानाचा ही अधिकार नव्हता. म्हणुन त्यांनी याविरुद्ध एकजुटीने लढा दिला आणि त्यात त्यांचा विजय झाला म्हणुन 8 मार्च हा संपुर्ण विश्वात जागतिक महिला दिन म्हणुन साजरा केला जातो, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या विभावरी देव यांनी केले.
श्री क्षेत्र रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या वतीने आज ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील यांच्या संकल्पनेतील दुसरी महाआरती आणि त्या महाआरतीचे मानकरी म्हणून देवस्थान मधील सर्व सेवेकरी महिला यांच्या हस्ते सकाळी 7:30 वाजता आरती करण्यात आली. तसेच या सर्व महिलांना त्यांच्या सेवेबद्दल शाल, श्रीफळ आणि साडीचोळी देऊन गौरवण्यात आले. तसेच कारेगावच्या ग्रामपंचायत सदस्या प्रियांका गवारे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
यावेळी देवस्थानचे मुख्य विश्वस्त ओंकार देव, उपाध्यक्ष संदीप दौडकर, सरस्वती पाचुंदकर पाटील, पोलिस पाटील सारिका पाचुंदकर , विभाताई देव, सुमन हगवणे, अनिता वाळके, वर्षा पाचुंदकर पाटील, रुपाली देव, श्रुती हगवणे, मेघना गवारे, सेवेकरी, माता-भगिनी, भाविक भक्त तसेच आसपासच्या परिसरातील अनेक महिला उपस्थित होत्या.
समाजातील प्रत्येक महिला हि घराची सगळी जबाबदारी पार पाडून कामासाठी बाहेर पडत असते. आमच्या देवस्थान मधील सर्व सेवेकरी महिला या निस्वार्थी काम करतात. त्यामुळे त्यांना आज जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही महाआरतीचा मान दिला.
स्वाती पाचुंदकर (अध्यक्षा)
श्री क्षेत्र रांजणगाव गणपती ट्रस्ट
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…