मुख्य बातम्या

शिरुर; मनरेगा विहिर गैरव्यवहार प्रकरणी बीडीओंनी दिला स्थळ पाहणीचा आदेश

रांजणगाव गणपती (तेजस फडके) भांबर्डे (ता. शिरुर) येथील मनरेगा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीच्या कामावर गंभीर शंका उपस्थित होत असून, या पार्श्वभूमीवर शिरुर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ स्थळपाहणी करुन पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत मच्छिंद्र बापूराव पवार यांनी २६ सप्टेंबर २०२५ रोजी दाखल केलेल्या तक्रारीत सुरेश विश्वनाथ देशमुख आणि प्रदीप सुरेश देशमुख यांनी घेतलेल्या विहिरीची मंजुरी गट नं. ४७ मध्ये असून प्रत्यक्षात काम गट नं. ६१७ मध्ये केल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे, गट नं. ६१७ मध्ये देशमुख यांचे नाव ७/१२ व ८-अ उताऱ्यात नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर उपोषण सुरु असताना शिरुर पंचायत समितीचे ग्रामविकास अधिकारी (वर्ग १) यांनी विस्तार अधिकारी बी.आर. गावडे, शाखा अभियंता रोशन तुमसरे (जि.प. बांधकाम), तसेच तांत्रिक अधिकारी राजेंद्र कोकरे (रोहयो शाखा) यांना तातडीने आज (दि ३) रोजी स्थळ पाहणी करुन मंजूर गट व प्रत्यक्ष खोदकाम झालेल्या गटाबाबत पंचनामा सादर करण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, या वादग्रस्त विहिरीच्या चौकशीवेळी देशमुख यांनाही उपस्थित राहण्यास सांगितले असून, आता या स्थळ पाहणीनंतर खरे काय आणि खोटे काय हे चित्र स्पष्ट होणार आहे. गावकऱ्यांमध्ये या चौकशीबाबत मोठी चर्चा सुरु झाली असून, मनरेगा योजनेत गैरव्यवहार झाला…? की केवळ वैयक्तिक सुडासाठी हा गाजावाजा केला गेला अशी सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

स्थळ पाहणीच्या वेळेस तक्रारदारचं गैरहजर…

आज दि ३ ऑक्टोबर २०२५ रोजी विस्तार अधिकारी बी.आर. गावडे, शाखा अभियंता रोशन तुमसरे (जि.प. बांधकाम), तसेच तांत्रिक अधिकारी राजेंद्र कोकरे (रोहयो शाखा) यांनी भांबर्डे गावातील गट क्रं ४७, ६२० आणि ६२२ यामध्ये पाहणी करुन पंचनामा अहवाल तयार केला आहे. यावेळी तक्रारदार मच्छिंद्र बापूराव पवार हे मात्र गैरहजर होते.

शिरुर तालुक्यात मनरेगा योजनेत गैरव्यवहाराचा आरोप; उपोषणाचा इशारा

शिरुर; मनरेगा गैरव्यवहाराचा खोटा आरोप…? देशमुखांचा पवारांवर पलटवार

Video; शिरुर तालुक्यात बिबट–मानव संघर्ष टाळण्यासाठी १२ ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अलर्ट सिस्टीम

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सणसवाडीत ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; बॅरलमध्ये पाणी भरून कंपनीची दिशाभूल, दोन सराईत चोरटे अटकेत

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील झेनिथ बायोकेमिकल इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीतून तब्बल ८०० लिटर डिझेल…

5 तास ago

महाराष्ट्राला ‘समग्र शिक्षा’त अधिक निधी द्या; केंद्रीय परिषदेत दादाजी भुसे यांची जोरदार मागणी

मुंबई: देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी ८.६१ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असतानाही ‘समग्र शिक्षा’ योजनेच्या…

5 तास ago

विद्यार्थ्यांवर लाठीमार म्हणजे लोकशाहीवरील काळा डाग; हे विद्यार्थ्यांच्या जिवावर उठलेलं निष्ठूर सरकार; विजय वडेट्टीवार

सिंदेवाही: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध…

5 तास ago

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

22 तास ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

22 तास ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

22 तास ago