मुख्य बातम्या

शिरुरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रताप, विनापरवाना झाडे पाडत केले बांधकाम; कारवाई करा, नागरीकांची मागणी

शिरुर (अरुणकुमार मोटे) कवठे येमाई (ता. शिरुर) येथील गट न.२६७ मध्ये वनविभागाची परवानगी न घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने निलगिरी, सिसम, लिंब अशी दहा झाडे पाडुन अनधिकृत बांधकाम केले आहे. याबाबत वृक्षप्रेमींनी तीव्र निषेध व्यक्त केला असुन कोणतीही परवानगी न घेता मोठी झाडे तोडल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आधिकाऱ्यांवर वनविभागाने कारवाई करण्याची मागणी होत आहे. याबाबतची माहीती कवठे येमाई येथील ग्रामस्थ शरद उघडे यांनी दिली आहे.

 

तसेच जिल्हाधिकारी यांची कोणतीही परवानगी न घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर ठिकाणी बांधकामही केले असल्याचा आरोप शरद उघडे, अमर उघडे यांनी केला आहे. जर शासकीय आधिकारी नियम डावलुन बेकायदेशीरपणे वृक्ष तोडत असेल तर याला वेळी चाप बसणे गरजेचे आहे.

 

शिरुरचे तत्कालीन गटविकास अधिकारी अजित देसाई यांनी काही महीन्यांपुर्वी शिरुर पंचायत समिती आवारातील वृक्ष कापले होते. त्याविषयी सामाजिक कार्यकर्ते व वृक्षप्रेमी नाथा पाचर्णे यांनी आवाज उठवत त्यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडले होते. आता वनविभाग व जिल्हाधिकारी साहेब सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का…?की राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांना पाठीशी घालणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

याविषयी वनपरीक्षेत्र आधिकारी प्रताप जगताप यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की या गट नंबरमध्ये वृक्ष काढण्याची कुठलीही परवानगी काढलेली नाही. त्यामुळे रीतसर पंचनामा करण्यात येईल आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

शिरुर-पाबळ रस्त्यासाठी होतोय चक्क मातीचा वापर; सार्वजनिक बांधकाम उपविभाग निद्रीस्त

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

1 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

1 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

2 तास ago

कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक, वीरपत्नी व वीरमातांचा कृतज्ञता सन्मान; सरकार सदैव सोबत; सुनेत्रा पवार

मुंबई: कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राज्य सरकार…

2 तास ago

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून; मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, शिक्रापूर पोलिसांनी काही तासांत उकलले गूढ

अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटने गळा दाबून केली हत्या; पत्नीसह अटक शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर येथील…

12 तास ago

हेडऐवजी टेलपासून कालव्याचे अस्तरीकरण; शिरूरच्या शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप, आंदोलनाचा इशारा

आंबळे ग्रामस्थांचा चासकमान पाटबंधारे विभागाला इशारा; हेडपासून काम सुरू न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार…

16 तास ago