jayandra-shinde
शिक्रापूर : पत्नीचा अचानक मृत्यू झाल्यानंतर महिनाभरापासून पत्नीच्या विरहात असलेल्या पतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथे घडली आहे. जयेंद्र सुभाष शिंदे (वय ४५, रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरूर) असे गळफास घेऊन आत्महत्या केल्याल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत मयूर रामदास शिंदे (वय ४२, रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरुर ) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयेंद्र यांची पत्नी छाया यांचे एक महिन्यापूर्वी देवदर्शनासाठी जाताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. छाया यांचे निधन झाल्याने जयेंद्र नैराश्यामध्ये होते. ११ जुलै रोजी सकाळच्या सुमारास जयेंद्र अचानक घरातून गेल्याने त्यांच्या आई व भावाने त्यांचा शोध घेतला. यावेळी त्यांना जयेंद्र याने शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. तत्काळ जयेंद्र यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. जयेंद्र आणि त्यांची पत्नी छाया या दोघांचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अमोल चव्हाण करत आहे.
शिरूर तालुक्यात लग्नाच्या आमिषाने विवाहितेवर अत्याचार…
खळबळजनक! शिरूर तालुक्यात करंट देऊन पत्नीचा केला खून; कारण…
रांजणगाव एमआयडीसीमधील कंपनीत कामगाराचा मृत्यू…
शिरूर तालुक्यातील दांपत्याचे अपहरण करुन उलटे टांगून बेदम मारहाण; गुन्हा दाखल…
अष्टविनायक महामार्गावर टेम्पोच्या धडकेत मोटरसायकल स्वाराचा मृत्यू…
मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…
ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…
मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…
अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…
फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…