मुख्य बातम्या

युद्ध लढाव मराठ्यांनीच आणि जिंकाव पण मराठ्यांनीच: मनोज जरांगे पाटील

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली असून आरक्षण आपण आता घेतल्यात जमा आहे. या दृष्टीने सकल मराठी समाजाने मुंबईकडे कुच केली असून आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नाही. कारण युद्ध लढाव मराठ्यांनीच आणि जिंकाव पण मराठ्यांनीच असे प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी केले.

सोमवार (दि 22) रोजी कारेगाव येथे मनोज जरांगे पाटील यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेची नियोजित वेळ सायंकाळची होती. परंतु मनोज जरांगे हे नगरमार्गे शिरुरकडे रस्त्यात येताना गावोगावी त्यांचे नागरिकांच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यामुळे कारेगाव येथे मंगळवार (दि 23) रोजी पहाटे अडीच वाजता त्यांचे आगमन झाले. परंतु कडाक्याच्या थंडीतही लाखों लोकांनी त्यांच्या सभेला गर्दी केली होती.

यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की देव आडवा आला तरी ओबीसीतून आरक्षण घेणारच. प्रत्येक वेळी सरकारने समाजाची फसवणूक केली आहे. पहिल्यांदाच मराठ्यांमध्ये एकजूट झाली आहे. यातही फूट पाडण्याचा प्रयत्न सुरु असुन यासाठी काहीजण देव पाण्यात बुडवून बसले आहेत. त्यामुळे मराठ्यांची पुढे अशीच एकी राहिली तर जगामध्ये मराठा समाज प्रगत म्हणून पुढे येईल. शिक्षण व नोकरीमध्ये आपला टक्का वाढला पाहिजे.

अनेक राजकीय पक्षाचे नेते आपण मोठे केले. परंतु आज एकही नेता आरक्षणाच्या बाजूने बोलायला तयार नाही. आमच्या आरक्षणाच्या आड जर हे नेते आले. तर त्यांचा राजकीय सुपडा साफ करु असाही इशारा जरांगे यांनी दिला. तसेच मी मॅनेज होत नाही हीच सरकार पुढे खरी डोकेदुखी आहे. मराठा आरक्षणा संदर्भात माझ्यासोबत वेगवेगळ्या मंत्र्यांच्या तब्बल 27 ते 28 बैठका झाल्या. परंतु एकदा आलेला मंत्री परत पुन्हा येतच नाही असेही ते म्हणाले.

पुणे-नगर रस्त्यावर मनोज जरांगे पाटलांच्या मोर्चामुळे वाहतुकीत मोठे बदल

पुणे-नगर रस्त्यावर मनोज जरांगे पाटलांच्या मोर्चामुळे वाहतुकीत मोठे बदल

शिरुर तालुक्यात 22 जानेवारीला मनोज जरांगे पाटील यांची सभा

सणसवाडीत मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर खासदारांचा विश्वास

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडल्याचा दावा शिवसेना (शिंदे गट) समर्थकांकडून करण्यात येत आहे. उबाठा…

15 तास ago

शिंदेंची ताकद वाढली, ठाकरेंपुढे नवे राजकीय आव्हान

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेतील फूट आणि त्यानंतरचे बदलते राजकीय समीकरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले…

15 तास ago

शिरूर! आमदाबादच्या युवकाने 27व्या वाढदिवसानिमित्त केली 27 वृक्षांची लागवड…

शिरूर (नितीन थोरात) : वाढदिवस साजरा करण्याच्या पारंपरिक पद्धतींपेक्षा समाजोपयोगी आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देणारा…

15 तास ago

पॉलीटेक्निक प्रवेश अर्जाची अंतिम मुदत 2 जुलैपर्यंत वाढवली; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

मुंबई: प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलीटेक्निक) अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत २…

15 तास ago

निकृष्ट कोळसा पुरवठ्यामुळे वीज निर्मितीवर परिणाम; दोषींना ब्लॅकलिस्ट करण्याची वडेट्टीवारांची मागणी

मुंबई: राज्यातील वाढती वीज मागणी आणि वीज निर्मिती केंद्रांतील संच बंद पडण्यामागे निकृष्ट दर्जाच्या कोळसा पुरवठ्याचे…

15 तास ago

शिरूर तालुक्यातील आरोपींचा दीड किलोमीटर पाठलाग करत पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

मंचर (कैलास गायकवाड) : शिरूर तालुक्याच्या सीमा परिसरात दुचाकीवरून येऊन दागिने हिसकावून पळून जाणाऱ्या तीन…

15 तास ago