मुख्य बातम्या

युद्ध लढाव मराठ्यांनीच आणि जिंकाव पण मराठ्यांनीच: मनोज जरांगे पाटील

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली असून आरक्षण आपण आता घेतल्यात जमा आहे. या दृष्टीने सकल मराठी समाजाने मुंबईकडे कुच केली असून आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नाही. कारण युद्ध लढाव मराठ्यांनीच आणि जिंकाव पण मराठ्यांनीच असे प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी केले.

सोमवार (दि 22) रोजी कारेगाव येथे मनोज जरांगे पाटील यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेची नियोजित वेळ सायंकाळची होती. परंतु मनोज जरांगे हे नगरमार्गे शिरुरकडे रस्त्यात येताना गावोगावी त्यांचे नागरिकांच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यामुळे कारेगाव येथे मंगळवार (दि 23) रोजी पहाटे अडीच वाजता त्यांचे आगमन झाले. परंतु कडाक्याच्या थंडीतही लाखों लोकांनी त्यांच्या सभेला गर्दी केली होती.

यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की देव आडवा आला तरी ओबीसीतून आरक्षण घेणारच. प्रत्येक वेळी सरकारने समाजाची फसवणूक केली आहे. पहिल्यांदाच मराठ्यांमध्ये एकजूट झाली आहे. यातही फूट पाडण्याचा प्रयत्न सुरु असुन यासाठी काहीजण देव पाण्यात बुडवून बसले आहेत. त्यामुळे मराठ्यांची पुढे अशीच एकी राहिली तर जगामध्ये मराठा समाज प्रगत म्हणून पुढे येईल. शिक्षण व नोकरीमध्ये आपला टक्का वाढला पाहिजे.

अनेक राजकीय पक्षाचे नेते आपण मोठे केले. परंतु आज एकही नेता आरक्षणाच्या बाजूने बोलायला तयार नाही. आमच्या आरक्षणाच्या आड जर हे नेते आले. तर त्यांचा राजकीय सुपडा साफ करु असाही इशारा जरांगे यांनी दिला. तसेच मी मॅनेज होत नाही हीच सरकार पुढे खरी डोकेदुखी आहे. मराठा आरक्षणा संदर्भात माझ्यासोबत वेगवेगळ्या मंत्र्यांच्या तब्बल 27 ते 28 बैठका झाल्या. परंतु एकदा आलेला मंत्री परत पुन्हा येतच नाही असेही ते म्हणाले.

पुणे-नगर रस्त्यावर मनोज जरांगे पाटलांच्या मोर्चामुळे वाहतुकीत मोठे बदल

पुणे-नगर रस्त्यावर मनोज जरांगे पाटलांच्या मोर्चामुळे वाहतुकीत मोठे बदल

शिरुर तालुक्यात 22 जानेवारीला मनोज जरांगे पाटील यांची सभा

सणसवाडीत मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी सरकार कटिबद्ध; कुटुंबाच्या पुनर्वसनाची हमी; डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना,…

13 तास ago

विड्याचे पान सेवन करण्याची पद्धत

जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…

21 तास ago

कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर

बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…

21 तास ago

राज्यात जनगणना मोहिमेला सुरुवात; नागरिकांना ‘स्व-गणना’ची सुविधा

मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…

21 तास ago

निष्ठा, समर्पण आणि साधेपणाचा वारसा: यशवंत हाप्पे यांना काँग्रेसची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…

21 तास ago

चिमुरडीवरील अत्याचार-हत्येने पुणे हादरले; कायदा-सुव्यवस्था कोलमडली, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…

21 तास ago