शिरूर (अरुणकुमार मोटे) : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील तलाठ्यांचे रोज नवनविन कारनामे समोर येत असून त्यांनी नोंदीसाठी अनेक नागरीकांना लुटल्याची खमंग चर्चा तालुकाभर चांगलीच रंगली आहे.
तलाठी वरीष्ठांच्या आदेशालाही जुमानत नसून नागरीकांना लुटतच आहे. सणसवाडी तलाठी कार्यालय व कोरेगाव भीमा तलाठी कार्यालय मधील अवैध नोंदी, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम विरुद्ध कामकाजाबाबत सामाजिक कार्यकर्ते सुभाष जगताप हे येत्या १०डिसेंबर पासून शिरूर तहसील कार्यालयात उपोषण सुरू करणार आहेत.
वरीष्ठ अधिकारी या लाचखोर तलाठ्यावर काय कारवाई हे पाहणे महत्वाचे ठरेल. तसेच त्यांचा त्या सजातून हकालपट्टी होण्याची मागणी परीसरातील नागरिक करत आहे. हे तलाठी पैसे दिल्याशिवाय नोंदच करत नाही. त्यांनी लोंकाना लुटून ‘विशाल’ कमावलेल्या ‘काळया’ पैश्याची लाल लुचपत विभागामार्फत चौकशी लावणार असल्याचेही सुभाष जगताप यांनी सांगितले आहे.
शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘प्रलंबित असणाऱ्या नोंदीचे काम प्रगतीपथावर असून सणसवाडी व कोरेगाव भीमा तलाठी यांना प्रलंबित नोंदींबाबत व गुंठेवारीच्या नोंदीबाबत खुलासा मागितला आहे.’
शिरूर! लाललुचपतची कारवाई होऊनही ‘त्या’ तलाठ्याची हौस काही भागेना…
शिरूर तालुक्यातील ‘तलाठी, मंडल आधिकारी जोमात नागरीक कोमात’ अशी अवस्था…
शिरूर तालुक्यातील तलाठी, मंडल आधिकाऱ्यांकडून आर्थिक मलईसाठी नोंदी करण्यासाठी होतेय टाळाटाळ…
Video: महसूल प्रशासन निवडणुकीत व्यस्त, वाळू माफिया चोरतात वाळू मस्त…
शिरुर तालुक्यात मारहाण करुन जबरी दरोडा; सोन्याच्या झुब्यासाठी महिलेचे कान कापले
जनता दल प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट
पुणे-नगर महामार्गावर युवती किंवा महिलांना लिफ्ट देताय…? सावधान…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…