मुख्य बातम्या

वाबळेवाडीच्या शाळेचा कायापालट करणाऱ्या वारे गुरुजींना पुरस्कार!

मुंबईः शिरूर तालुक्यातील वाबळेवाडीच्या शाळेचा कायापालट करणाऱ्या वारे गुरुजींना एबीपी माझाच्या वतीने ‘माझा सन्मान’ पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले आहे. एबीपी माझाच्या यंदाच्या ‘माझा सन्मान’ पुरस्कारांचे वितरण झाले. यामध्ये विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला आहे. ‘माझा सन्मान’ पुरस्कार सोहळा आज (26 ऑगस्ट) रात्री आठ वाजता आणि उद्या (27 ऑगस्ट) रात्री सात वाजता एबीपी माझा चॅनेलवर पाहता येणार आहे.

वाबळेवाडीची जिल्हा परिषदेची शाळा म्हटले की काही दिवसांपूर्वी नाकं मुरडली जायची. पण, वारे गुरुजींनी शाळेचे नाव मोठे केले आहे. त्यांच्या कल्पनेला आणि मेहनतीला अनेक हातांची साथ लाभली. वाबळेवाडीची जिल्हा परिषदेची ही शाळा आंतरराष्ट्रीय झाली आहे. केवळ व्यवस्थेकडे बोट दाखवत न बसता वारे गुरुजींनी हे करुन दाखवले आहे.

शाळेचा कायापालट करत असताना वारे गुरुजींवर अनेक आरोपही झाले, बदली झाली. पण बदली होऊनही गेलेल्या जालिंदरनगर शाळेचाही त्यांनी सात महिन्यात कायापालट केला आहे. नवी पिढी ज्या ज्ञानमंदिरात घडते त्या ज्ञानमंदिरांना घडवणाऱ्या वारे गुरुजींना एबीपी माझाच्या वतीने ‘माझा सन्मान’ पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले आहे.

दरम्यान, दत्तात्रेय वारे गुरजींची बदली काही महिन्यांपू्र्वीच खेड तालुक्यातील कन्हेरसर गावातील जालिंदरनगरच्या शाळेत झाली. ही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असतानाच वारे गुरूजींनी काही शाळेचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. गुरूजींच्या या शाळेत प्रवेश घेण्यासाठी आता रांगा लागत आहेत. या शाळेतील मुले फ्रेंच, जर्मनी, जपानी, इंग्रजीसारख्या परदेशी भाषा अगदी सहजपणे बोलतात. केवळ 100 ते 200 नव्हे तर एक हजारापर्यंतचे विद्यार्थ्यांचे पाढे तोंडपाठ आहेत. तंत्रज्ञानातही ही मुले एक पाऊल पुढे असल्याने वारे गुरूजी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

वाबळेवाडी शाळेच्या गैरव्यवहार प्रकरण अन् बरच काही…

शिक्रापुरात येऊन शिक्षण मंत्र्यांनी फिरवली वाबळेवाडीकडे पाठ

शिक्रापूरच्या वाबळेवाडीत जमिनीच्या वादातून हाणामारी

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

13 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

13 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

13 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

15 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

1 दिवस ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

1 दिवस ago