न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील पारोडी गावात मंगळवार (दि १२) जुन रोजी रात्री ८:४५ च्या दरम्यान किरण टेमगिरे यांच्या दुमजली बंगल्यावर वीज कोसळून घराचे मोठे नुकसान झाले आहे. विजेचा जोरदार धक्का बसल्याने बंगल्यावरील टोपीचा काही भाग जमिनीत कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सुमारे २ लाख ५० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
मंगळवारी रात्री ८:४५ च्या सुमारास पारोडी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस चालु होता. यावेळी अचानक मोठा विजांचा कडकडाट झाल्याचा आवाज परिसरात ऐकू आला. या घटनेनंतर तातडीने किरण टेमगिरे यांनी घरी धाव घेतली असता घरातील संपुर्ण वायरिंग जळून गेल्याचे व घरातील वीज मीटर उद्ध्वस्त झाल्याचे आढळले. टीव्ही, फ्रीज, पंखे, लाईट फिटिंग्ज आदी सर्व विद्युत साहित्य पूर्णपणे निकामी झाले आहे.
बुधवार (दि १३) रोजी पारोडी गावचे पोलीस पाटील कुंडलिक येळे आणि तलाठी कोमल माने यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. वीज वितरण कंपनीकडूनही प्राथमिक तपास सुरु आहे. महसूल व विज वितरणच्या अधिकाऱ्यांनी संपुर्ण नुकसानीचा अहवाल तयार केल्यानंतर मदत मंजुर करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे.
सध्या हवामान विभागाने विजांसह पावसाचा इशारा दिलेला असुन ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी थांबण्याचे व अनावश्यकपणे इलेक्ट्रिक उपकरणे सुरु ठेवू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
निमोणेकरांनी जपली माणुसकी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या थोरात यांच्या कुटुंबियांना लाखोंची आर्थिक मदत
संतापजनक; नात्याला काळिमा फासणारी दुर्दैवी घटना; बापाचा स्वतःच्याच मुलीवर लैंगिक अत्याचार
आमदार माऊली कटके यांच्या दुर्लक्षाने आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी…?
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…