मुख्य बातम्या

‘दिलीप वळसे पाटील यांचे काय चालले आहे? यावर आढळराव पाटील म्हणाले…

पुणे : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मला विचारले ‘दिलीप वळसे पाटील यांचे काय चालले आहे? यावर मी म्हणालो ‘जयंतराव, दिलीप वळसे पाटील हे 100 टक्के मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. माझे मन साफ आहे. माझ्या मनात तेच ओठावर आहे. वळसे पाटलांची जागा मोठ्या मताधिक्क्यानेच निवडून येणार’ असे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जयंत पाटील यांच्याबरोबर झालेल्या बंद दरवाजातील चर्चेला पूर्णविराम दिला.

पाबळ भोरशेत (ता. शिरूर ) येथे आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या कोपरा सभेत माजी खासदार आढळराव यांनी हा किस्सा सांगितला.

शिवाजीराव आढळराव पाटील पुढे म्हणाले, ‘पाबळ, धामारी, खैरनगर परिसरात दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लागली आहेत. मी देखील दहा-वीस लाख रुपयांची अनेक कामे मार्गी लावली आहेत. आता फुटाणवाडी येथे सभागृहासाठी ४० लाख रुपयांचा निधी आपण आणला आहे. आपल्या भागातून विधानसभेसाठी वळसे पाटील यांनाच मतदान करावे.’

दिलीप वळसे पाटील यावेळी म्हणाले, ‘माझ्या दृष्टीने पाणी हा महत्त्वाचा विषय आहे. भविष्यात पाणी प्रश्न पेटणार आहे. आंबेगाव-शिरूर तालुकावासियांच्या हक्काचे असणाऱ्या डिंभे (हुतात्मा बाबू गेणू जलसागर) धरणातील पाणी बोगदा पाडून पळवून नेण्याचा काहींचा डाव आहे. याविषयी आपण बोगद्याला स्थगिती आणून अर्धी लढाई जिंकली आहे. पुढील पाच वर्षे आपण पाण्यासाठीच लढा देणार आहोत. शिरूर तालुक्यातील 14 गावांचा पाणी प्रश्न प्राधान्याने सोडायला जाणार आहे.’

मतचाचणी! दिलीप वळसे पाटील यांना यंदाची निवडणूक जड जाणार…?

Video: शिरूर मतदारसंघातील ४२ गावांमधील नागरिकांची दिलीप वळसे-पाटील यांच्यावर प्रचंड नाराजी…

शिरूर! देवदत्त निकम यांच्यासाठी काही गावात फुलांच्या पायघड्या आणि ज्येष्ठांकडून लोकवर्गणी…

दिलीप वळसे-पाटील यांना पाठिंबा देण्यावरून पत्रकार परिषदेत जोरदार राडा…

शिरुर-आंबेगाव मतदार संघातील बारा गावच्या पाणीप्रश्नामुळे वळसे पाटलांवर शेतकरी नाराज…?

दिलीप वळसे पाटील यांना भरसभेत अश्रू अनावर…

दिलीप वळसे पाटील यांच्या तत्परतेमुळे वाचला एकाचा प्राण…

Loading ...
Loading ...
शिरूर तालुका टीम

Recent Posts

आनंदआश्रमात गुरुपौर्णिमेचा उत्साह; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवसैनिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

ठाणे: ठाण्यातील टेंभी नाका येथील शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या आनंदआश्रमात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी…

4 तास ago

अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; राज्यव्यापी नशामुक्ती अभियानाचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबईतील एनएससीआय डोम येथे होणार प्रारंभ; युवक, विद्यार्थी आणि नागरिकांना प्रतिज्ञेत सहभागी होण्याचे मंत्री मंगलप्रभात…

4 तास ago

धुराची आग लावणाऱ्यांनाच आता धुराची अॅलर्जी!

मुंबई: देशभरात सध्या जंतर-मंतरवरील आंदोलनाची चर्चा रंगली आहे. काही आंदोलनकर्त्यांनी वापरलेल्या अश्लील, अपमानास्पद आणि खालच्या…

4 तास ago

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…

19 तास ago

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…

22 तास ago

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

2 दिवस ago