शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इयत्ता पाचवीतील विद्यार्थीनी सौम्या सुनील वरे हिने शैक्षणिक वर्ष सन २०२५-२०२६ मध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत नवोदय विद्यालयासाठी आपली निवड निश्चित केली आहे. तिच्या या यशामुळे शाळेसह संपूर्ण गावाची मान उंचावली असून परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दि १५ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या या स्पर्धात्मक परीक्षेत हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कठीण स्पर्धेतून मार्ग काढत सौम्याने मिळवलेले हे यश तिच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे प्रतीक मानले जात आहे. तिच्या या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक पी. सी. बारहाते तसेच वर्गशिक्षक लहू गाजरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
भारत सरकारच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणाऱ्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता सहावी ते बारावीपर्यंत CBSE अभ्यासक्रमानुसार दर्जेदार व मोफत शिक्षण, तसेच निवास, भोजन व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. पुणे जिल्ह्यातील पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील नवोदय विद्यालयात सौम्या पुढील शिक्षण घेणार आहे.
सौम्या ही सर्वसामान्य कुटुंबातील असून तिचे वडील सुनील वरे हे शेतीसोबतच ‘आपले सरकार सेवा केंद्र’ चालवतात, तर आई सारिका वरे या कोतवाल म्हणून कार्यरत आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही सौम्याने जिद्दीने अभ्यास करून मिळवलेले हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तिच्या या यशाबद्दल गावकऱ्यांच्या वतीने तिचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला माजी उपसरपंच रामदास ढोमे, विकासोचे अध्यक्ष किरण ढोमे, लक्ष्मण गायकवाड, कैलासराव बोंबे, विजय बोंबे, आबाजी पोखरकर, पंढरीनाथ वरे, देवराम ढोमे, माउली ढोमे, बाळासाहेब बोंबे, अविनाश वरे, गौरेश दरेकर, सागर लोंढे, सर्जेराव उदागे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सौम्याच्या यशामुळे पिंपरखेड गावात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात ती आणखी मोठे यश मिळवेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…
शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…
माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…
श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…
मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…
नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…