मुंबई (प्रतिनिधी) राज्यात दरवर्षी हजारो तरुण आत्महत्या करत आहेत. हि केवळ आकड्यांची बाब नाही, तर एका पिढीचे भविष्य अंधारात ढकलणारी भीषण वस्तुस्थिती आहे. दुर्दैवाने सरकार या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका राज्य युवा धोरण समितीचे सदस्य ॲड. संग्राम शेवाळे यांनी मंत्रालयातील बैठकीत केली.
राज्याचे क्रीडा व युवा कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत ॲड. शेवाळे यांनी नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या धक्कादायक आकडेवारीचा दाखला देत राज्यातील आत्महत्यांचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे निदर्शनास आणून दिले. “तरुण आत्महत्या करत आहेत, घरे उद्ध्वस्त होत आहेत आणि सरकार मात्र योजनांच्या नावाखाली कागदोपत्री हालचाली करत आहे,” अशी कडवट टीका त्यांनी केली.
राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये समुपदेशन केंद्र, २४ तास हेल्पलाईन आणि मानसिक आरोग्यावरील जनजागृती मोहिमा राबवण्याची तातडीची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “जर सरकार आज पावले उचलणार नसेल, तर उद्याची पिढी कायमची हरवण्याची भीती आहे,” असा इशारा त्यांनी दिला.
या बैठकीला आमदार सत्यजित तांबे, रोहीत पाटील, अभिजित पाटील, अमित गोरखे, संतोष दानवे, राजेश पवार, आशुतोष काळे, प्रविण दटके, देवेंद्र कोठे, बाबासाहेब देशमुख, प्रकाश सुर्वे तसेच विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शिरुर तालुक्यात प्रशासनाकडुन गोपनीयता फाट्यावर; तक्रारदारचं असुरक्षित…?
शिरुर तालुक्यात अनेक लॉजवर वेश्या व्यवसाय जोमात; कारवाईची मागणी
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…