मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती येथे शेळके नगरमधील रस्त्याचे भुमिपुजन उत्साहात संपन्न

रांजणगाव गणपती (तेजस फडके): राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच युवासेना पुणे जिल्हाप्रमुख बापुसाहेब कांतीलाल शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातुन रांजणगाव गणपती येथील शेळके नगर परिसरातील नवीन भांबर्डे रोड ते जुना भांबर्डे रोड या रस्त्यासाठी १०.५० लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला होता. या विकासकामाचे भुमिपुजन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले.

या रस्त्याच्या कामामुळे शेळके नगर परीसरातील नागरीकांना दळणवळणाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असुन, पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अडचणी कायमस्वरुपी दुर होणार आहेत. त्यामुळे परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

या भुमिपुजन कार्यक्रमास बापुसाहेब शिंदे, विक्रम पाचुंदकर, अजय गलांडे, देविदास शेळके, कैलासराव शेळके, वैभव खेडकर, प्रताप खेडकर, सुनील खेडकर, आनंदा खेडकर, संदीप कुटे, रावसाहेब पाचुंदकर, विलास बत्ते, सचिन कुटे, दादासाहेब मैद, निलेश कड, बाळासाहेब शेळके, संभाजीराव शेळके, पंडितराव लवांडे, गणेश शिंदे, गणेश देवकर, नंदकुमार शेळके, दत्तात्रय बत्ते, आदित्य सणसे आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच अर्चना शिंदे, सारिका शेळके, जया बत्ते, मंगल ढसाळ, अनिता गवते, पुनम खताळ, शोभा जायकर, प्रगती नागरगोजे, रुशाली चौरे, भाग्यश्री लोहार यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या रस्त्याच्या कामामुळे परिसराचा वेगाने विकास होईल, असा विश्वास यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला व माननीय नेतृत्वाचे आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

6 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

10 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

10 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

10 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

10 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

11 तास ago