शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्रावर आरोग्य सेवा वैदयकिय अधिकारी उपलब्ध नसल्याने अक्षरशः ठप्प झाली आहे. धक्कादायक म्हणजे नागरिकांना तक्रारीसाठी
तेथे तक्रार पुस्तिका व हालचाल रजिस्टर उपलब्धच नाही.येथील वैद्यकीय अधिकारी रुग्णांचा जीव धोक्यात घालून ‘फक्त पगारखाऊ नोकरशहा’ म्हणून वागत असल्याचा संतापजनक आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दोन डॉक्टरांची नेमणूक असूनही ते केंद्राच्या निवासस्थानी न राहता परगावी मजेत राहतात. रोज सकाळी थोडा वेळ येतात आणि कर्मचाऱ्यांच्या जीवावर दुपारी केंद्र सोडून निघून जातात. त्यामुळे १२ गावं आणि ४ उपकेंद्रांतील रुग्णांना उपचाराऐवजी प्राणघातक प्रतीक्षा करावी लागत आहे. एका मुजोर वैद्यकिय आधिकार्याचे वडील बडे आधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करताना वरीष्ठ आधिकाऱ्यांवर त्यांचा दबाव येतो अशी माहीती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.
गरोदर माता, सर्पदंश, अपघातग्रस्त, हृदयविकाराचा झटका अशा गंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळाले नाहीत तर मृत्यू ओढवतो. अनेकदा रुग्णांना खासगी रुग्णालयांचा मार्ग धरावा लागतो. मंचर, नारायणगाव, शिरूर येथे नेण्यासाठी वेळ, पैसा आणि जीव दोन्ही धोक्यात घालावे लागतात. “सरकारी डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे पेशंटला जीव गमावण्याची वेळ येते. ,असा थरकाप उडवणारा आरोप ग्रामस्थांनी थेट केला आहे.
स्थानिक कर्मचारी कितीही धावपळ करत असले तरी डॉक्टरच अनुपस्थित राहिल्याने उपचाराचा पाया कोसळतो. पावसाळ्यात साथीचे आजार पसरत आहेत, अपघातांची संख्या वाढली आहे, पण डॉक्टर मात्र शिरूरच्या थाटात बिझी आहेत! सरकारी निवासस्थान असूनही न राहणे, कर्तव्यावर दिरंगाई करणे आणि रुग्णांना मृत्यूच्या दाराशी ढकलणे, ही गंभीर बेपर्वाई असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.त्यामुळे संपूर्ण पंचक्रोशीमध्ये रोष उसळला आहे.
“बेजबाबदार डॉक्टरांची बदली करून येथे जबाबदार व रहिवासी अधिकारी नेमले नाहीत, तर आम्ही रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या या अधिकाऱ्यांना आरोग्य केंद्रात प्रवेश करू देणार नाही. गरज पडल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू!” असे तेथील नागरिकांनी सांगितले आहे.नागरिकांचा संताप आणि मृत्यूच्या छायेतूनही आरोग्य विभागाने आत्तापर्यंत केवळ ‘दुर्लक्ष’च केले आहे. “सरकारी पगार घेऊन डॉक्टर शिरूरमध्ये सुखासीन जीवन जगणार, आणि टाकळी हाजीचे नागरिक मात्र मृत्यूला सामोरे जाणार – हे आता आम्हाला सहन होणार नाही, असा जाहीर इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
मुख्यालयी निवासी राहूनच वैदयकिय अधिकाऱ्यांनी काम करावे. टाकळी हाजी येथे हलगर्जीपणा करणाऱ्या उपस्थित व निवासी न राहणाऱ्यां वैद्यकीय अधिकाऱ्यांना तात्काळ नोटीस बजावून कारवाई करणार आहे.
राजेश कट्टीमणी -प्रभारी तालुका आरोग्य आधिकारी,शिरूर
आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…
जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…
जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…
पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…
मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…