मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यातील त्या गावचे आरोग्य केंद्र ठरतंय ‘मृत्यू केंद्र’ ; बेजबाबदार डॉक्टरांवर ग्रामस्थांचा संताप

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्रावर आरोग्य सेवा वैदयकिय अधिकारी उपलब्ध नसल्याने अक्षरशः ठप्प झाली आहे. धक्कादायक म्हणजे नागरिकांना तक्रारीसाठी

तेथे तक्रार पुस्तिका व हालचाल रजिस्टर उपलब्धच नाही.येथील वैद्यकीय अधिकारी रुग्णांचा जीव धोक्यात घालून ‘फक्त पगारखाऊ नोकरशहा’ म्हणून वागत असल्याचा संतापजनक आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दोन डॉक्टरांची नेमणूक असूनही ते केंद्राच्या निवासस्थानी न राहता परगावी मजेत राहतात. रोज सकाळी थोडा वेळ येतात आणि कर्मचाऱ्यांच्या जीवावर दुपारी केंद्र सोडून निघून जातात. त्यामुळे १२ गावं आणि ४ उपकेंद्रांतील रुग्णांना उपचाराऐवजी प्राणघातक प्रतीक्षा करावी लागत आहे. एका मुजोर वैद्यकिय आधिकार्‍याचे वडील बडे आधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करताना वरीष्ठ आधिकाऱ्यांवर त्यांचा दबाव येतो अशी माहीती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.

गरोदर माता, सर्पदंश, अपघातग्रस्त, हृदयविकाराचा झटका अशा गंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळाले नाहीत तर मृत्यू ओढवतो. अनेकदा रुग्णांना खासगी रुग्णालयांचा मार्ग धरावा लागतो. मंचर, नारायणगाव, शिरूर येथे नेण्यासाठी वेळ, पैसा आणि जीव दोन्ही धोक्यात घालावे लागतात. “सरकारी डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे पेशंटला जीव गमावण्याची वेळ येते. ,असा थरकाप उडवणारा आरोप ग्रामस्थांनी थेट केला आहे.

स्थानिक कर्मचारी कितीही धावपळ करत असले तरी डॉक्टरच अनुपस्थित राहिल्याने उपचाराचा पाया कोसळतो. पावसाळ्यात साथीचे आजार पसरत आहेत, अपघातांची संख्या वाढली आहे, पण डॉक्टर मात्र शिरूरच्या थाटात बिझी आहेत! सरकारी निवासस्थान असूनही न राहणे, कर्तव्यावर दिरंगाई करणे आणि रुग्णांना मृत्यूच्या दाराशी ढकलणे, ही गंभीर बेपर्वाई असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.त्यामुळे संपूर्ण पंचक्रोशीमध्ये रोष उसळला आहे.

“बेजबाबदार डॉक्टरांची बदली करून येथे जबाबदार व रहिवासी अधिकारी नेमले नाहीत, तर आम्ही रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या या अधिकाऱ्यांना आरोग्य केंद्रात प्रवेश करू देणार नाही. गरज पडल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू!” असे तेथील नागरिकांनी सांगितले आहे.नागरिकांचा संताप आणि मृत्यूच्या छायेतूनही आरोग्य विभागाने आत्तापर्यंत केवळ ‘दुर्लक्ष’च केले आहे. “सरकारी पगार घेऊन डॉक्टर शिरूरमध्ये सुखासीन जीवन जगणार, आणि टाकळी हाजीचे नागरिक मात्र मृत्यूला सामोरे जाणार – हे आता आम्हाला सहन होणार नाही, असा जाहीर इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

मुख्यालयी निवासी राहूनच वैदयकिय अधिकाऱ्यांनी काम करावे. टाकळी हाजी येथे हलगर्जीपणा करणाऱ्या उपस्थित व निवासी न राहणाऱ्यां वैद्यकीय अधिकाऱ्यांना तात्काळ नोटीस बजावून कारवाई करणार आहे.

राजेश कट्टीमणी -प्रभारी तालुका आरोग्य आधिकारी,शिरूर

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

17 तास ago

‘डुबता महाराष्ट्र’ करण्याचे पाप महायुती सरकारचे; जनता माफ करणार नाही;  हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…

17 तास ago

एपस्टीन फाइल्समुळेच महिला विधेयक? गाडगीळ यांचा संशय

मुंबई: जनगणनेचा अहवाल २०२७ मध्ये पूर्ण होणार असताना, वर्षभरात उपलब्ध होणाऱ्या ताज्या आकडेवारीऐवजी ११ वर्षांपूर्वीच्या…

17 तास ago

महिला सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी सर्व सेवा एकाच छताखाली आणण्याचा निर्णय; निलम गोऱ्हे

मुंबई: राज्यातील महिला सुरक्षेशी संबंधित शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून महिलांना…

17 तास ago

बिहारचा ‘चाणक्य’ की पडद्यामागचा दिग्दर्शक?

बिहारच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, ते पाहून जुन्या नाटककारांना देखील लाज वाटावी! पडद्यावर…

17 तास ago

मुंबईत ‘तिसरे दशावतारी नाट्यसंमेलन’; दिग्गज कलावंतांच्या उपस्थितीत रंगणार दशावताराचा सोहळा

मुंबई: आरती आर्ट अकादमी (मुंबई), वेताळ प्रतिष्ठान (वेंगुर्ले) आणि अखिल भारतीय दशावतारी नाट्य परिषद व…

17 तास ago