मुख्य बातम्या

Video; शिरुरमध्ये सुडाच्या राजकारणामुळे कार्यकर्त्यांचा संयम संपला; शेखर पाचुंदकर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्याचे राजकारण एकेकाळी दर्जा, संयम आणि सुसंस्कृततेचे प्रतीक मानले जात होते. माजी मंत्री स्व. बापूसाहेब थिटे, स्व. रावसाहेब पवार, लोकनेते स्व. बाबुराव पाचर्णे, काकासाहेब पलांडे, पोपटराव गावडे, आणि अशोक पवार यांसारख्या नेत्यांनी विरोधकांनाही आपलेसे करत संवाद आणि कार्यकर्त्यांचा सन्मान या संस्कृतीला जपले. मात्र काही नेत्यांनी सध्या सुडाच राजकारण करत कार्यकर्त्यांना वेठीस धरण्याचं काम चालु केल्याने ‘भारतीय जनता पार्टी’ मध्ये प्रवेश केल्याचे शेखर पाचुंदकर पाटील यांनी सांगितले.

पुढे बोलताना पाचुंदकर म्हणाले, या दिग्गजांच्या कार्यकाळात शेतीला पाणी, औद्योगिक विकास, रोजगाराच्या संधी आणि तालुक्याला साधनसंपन्नतेचा नवा चेहरा मिळाला. मात्र, आज हेच राजकारण संवादाऐवजी सूड आणि सन्मानाऐवजी अहंकाराच्या वाटेवर गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या काही वर्षात स्वतःच्या कार्यकर्त्यांना दूर ठेवणे, दबाव आणणे, त्रास देणे या प्रकारांनी सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात असंतोष वाढला आहे. आत्मपरीक्षण करण्याऐवजी बदला घेण्याचं राजकारण सुरु झालं आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.

शिरुर तालुक्यात आजही शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित, पाबळ आणि त्याबारा गावातील पाणीटंचाई गंभीर, बिबट्याचा उपद्रव वाढता, तर शेतीसाठी वीजपुरवठा अपुरा आहे. औद्योगिक क्षेत्र असतानाही कामगारांचे प्रश्न न सोडवलेले, तर ग्रामीण भागात विकासाचे स्वप्न अजूनही अपुरेच आहे. या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष करून काही मंडळी राजकीय सुड भावनेने चुकीचे निर्णय घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर, भाजपमध्ये प्रवेश करुन सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आवाज म्हणून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला असल्याचेही पाचुंदकर यांनी स्पष्ट केले.

भाजपच्या माध्यमातून आता दबलेले, त्रासलेले आणि अन्याय सहन करणारे कार्यकर्ते एकत्र येऊन तालुक्याच्या जनतेचे खरे प्रश्न मांडणार आहेत. “शिरुरचा सुसंस्कृत राजकारणाचा वारसा पुन्हा जिवंत करणे आणि अन्यायग्रस्त कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देणे हेच आमचे ध्येय आहे,” असे पाचुंदकर यांनी ठामपणे सांगितले. यावेळी माजी जिल्हा जिल्हा परीषद सदस्या स्वाती पाचुंदकर यांनीही यावेळी भाजपा मध्ये प्रवेश केला.

शिरुरच्या ७ जिल्हा परिषद गट तसेच १४ पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत जाहीर

Video; जीवंतपणी आशा तुटल्या, मृत्यूनंतरही उजेड नाही दत्तक; गावातील स्मशानभुमीची दुरावस्था

Video; घोडनदीवरील पुलाचा प्रश्न ऐरणीवर, चिंचणी–बोरी ग्रामस्थांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा फायरींग प्रकरणातील दोन मुख्य सराईत आरोपी साताऱ्यातून जेरबंद

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान झालेल्या फायरींग प्रकरणातील दोन मुख्य…

13 तास ago

जेजुरी पोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेली चिमुकली सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन

संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी घटना जेजुरी: जेजुरी येथे दर्शनासाठी आलेली तीन वर्षांची चिमुकली हरवल्याने काही…

14 तास ago

पारोडीतील जिओ टॉवर रात्री बंद; संतप्त ग्रामस्थांचा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा

शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…

15 तास ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

16 तास ago

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे तर उपाध्यक्षपदी सुनिल जिते

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

17 तास ago

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…

17 तास ago