मुख्य बातम्या

‘त्यांचा कचरा जळतोय पण साहेब इथं आमचा जीव जळतोय’ रांजणगावमध्ये सर्वसामान्य लोकांचे आरोग्य धोक्यात

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील स्थानिक तसेच बाहेरचे भंगार व्यावसायिक यांनी औद्योगिक वसाहतीतुन आणलेला धोकादायक कचरा कोणत्याही स्वरुपाची प्रक्रिया न करता रात्रीच्या वेळेस जाळून टाकण्याचा सपाटाच लावला असुन त्यामुळे सर्व सामान्य नागरीकांना याचा विनाकारण त्रास होत आहे. तसेच धुरामुळे आसपासच्या परीसरातील झाडे, पशुपक्षी तसेच मानवी जीवनावर याचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे. परंतु प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.

रांजणगाव औद्योगिक वसाहतीत अनेक स्थानिक राजकीय पुढाऱ्यांचेच भंगार गोळा करण्याचे ठेके आहेत. हे ठेके मिळविण्यासाठी अनेकवेळा जीवघेणा संघर्षही झालेला आहे. रांजणगाव MIDC तील अनेक कंपन्यामध्ये मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे भंगार तसेच कचरा गोळा करुन ते कारेगाव, रांजणगाव तसेच ढोकसांगवी या परीसरातील मोकळ्या जागेत साठवले जाते. त्यात काही कचरा हा धोकादायक स्वरुपाचा असतो. त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याची जबाबदारी हि कंपनी किंवा संबंधित ठेकेदाराची असते. परंतु हे ठेकेदार हा धोकादायक कचरा रात्रीच्या वेळेस मोकळ्या जागी किंवा निर्जनस्थळी टाकुन पेटवून देतात. त्यामुळे प्रचंड मोठया प्रमाणात प्रदूषण होऊन आसपासच्या लोकांना त्याचा त्रास होत आहे.

 

रांजणगाव गणपती येथील फंडवस्ती जवळ गेल्या अनेक दिवसांपासुन असाच धोकादायक कचरा जाळण्याचे प्रकार सुरु आहेत. मात्र यामुळे या परीसरातील जनजीवन विस्कळित होऊ लागले असुन जाळलेल्या कचऱ्याच्या धुराचा थेट पशुधन, झाडे तसेच मानवी जीवनावर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण महामंडळाने या संबंधित भंगार व्यावसायिकांवर कारवाई करावी अशी मागणी प्रताप फंड व विवेकानंद फंड यांनी केली आहे.

शिरुरचं प्रशासन कोमात भंगार ठेकेदार जोमात…
रांजणगाव गणपती येथील काही स्थानिक भंगार व्यावसायिक तसेच काही बाहेरगावचे भंगार व्यावसायिक यांच्या अभद्र युतीमुळे फंडवस्ती इथं हा भंगार कचरा आणला जातो. रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील विविध कंपन्या या भंगार कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ठेकेदारांना देतात. परंतु संबंधित ठेकेदार हे या भंगार कचऱ्यावर कोणत्याही स्वरूपाची प्रक्रिया न करता रात्री उशिरा जाळून टाकतात. त्यामुळे मोठया प्रमाणात वायु प्रदूषण होऊन स्थानिक नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परंतु राजरोजपणे हा सगळा प्रकार चालु असताना स्थानिक प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवक, तलाठी, पोलिस नक्की काय करतात…? असा प्रश्न निर्माण होत आहे. या भंगार ठेकेदारांकडुन सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना मोठया प्रमाणात ‘आर्थिक मलिदा’ मिळत असल्याने अधिकारी जाणीवपुर्वक याकडे कानाडोळा करत असल्याचीही सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

7 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

7 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

11 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

11 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

11 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

12 तास ago