मुख्य बातम्या

महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी मतदारांनी दाखवून दिलं; ये ‘दादागिरी’ नही चलेगी, करारा ‘जबाव’ मिलेगा…

शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्र राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 30 जागा, महायुतीला 17 जागा तर 1 जागेवर अपक्ष उमेदवार निवडुन आला. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधी शिरुरचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांना ‘तु खासदार कसा होतो, तेच बघतो’ असा दम दिला. त्यानंतर शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांना ‘तु आमदार कसा होतो असा दम दिला. त्यानंतर नगर दक्षिणचे लोकसभेचे उमेदवार निलेश लंके आणि बीडचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना दम दिला. परंतु महाराष्ट्रातील स्वाभिमानी मतदारांनी मात्र ‘ये दादागिरी नही चलेगी, करारा जबाव मिलेगा’ असं म्हणतं कोल्हे, लंके आणि सोनवणे यांना दिल्लीत पाठवलं.

 

गेल्या पाच वर्षात महाराष्ट्र राज्यात विविध घडामोडी घडल्या. आधी भाजपाला सत्तेपासुन दुर ठेवत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची युती झाली. त्यानंतर शिवसेना उभी फूट पाडत एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर राष्ट्रवादीत फूट पाडत अजित पवार सत्तेत सामील झाले. त्यानंतर देशातील लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. परंतु लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवार यांना साथ न देणाऱ्या आणि त्यांना सोडुन जाणाऱ्या खासदार तसेच आमदार आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीत पराभूत करण्यासाठी आव्हान दिलं होत.

 

परंतु भाजपाने केलेल फोडाफोडीच राजकारण महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेच्या पचनी पडलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांना स्वाभिमानी मतदारांनी साथ देत महायुतीला महाविकास आघाडीला पसंती देत महायुतीला नाकारल्याचे स्पष्ट चित्र सगळीकडे दिसत आहे. लोकसभेच्या निकालाचा मोठा परिणाम यापुढील विधानसभा, नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच इतर सर्व निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.

शिरुर मतदार संघात तुतारी वाजली, घड्याळाची टिकटिक बंद

शिरुरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दोन तालुकाध्यक्षाच्या गावातच डॉ. अमोल कोल्हे यांना आघाडी

शिरुरमध्ये अजित पवार यांना धक्का! पाहा कुठे फिरली निवडणूक

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

2 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

2 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

2 तास ago

कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक, वीरपत्नी व वीरमातांचा कृतज्ञता सन्मान; सरकार सदैव सोबत; सुनेत्रा पवार

मुंबई: कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राज्य सरकार…

2 तास ago

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून; मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, शिक्रापूर पोलिसांनी काही तासांत उकलले गूढ

अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटने गळा दाबून केली हत्या; पत्नीसह अटक शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर येथील…

13 तास ago

हेडऐवजी टेलपासून कालव्याचे अस्तरीकरण; शिरूरच्या शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप, आंदोलनाचा इशारा

आंबळे ग्रामस्थांचा चासकमान पाटबंधारे विभागाला इशारा; हेडपासून काम सुरू न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार…

16 तास ago