शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल
शिरूर (अरुणकुमार मोटे): चिंचोली मोराची (ता. शिरूर) येथे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर आदेशानुसार गावात जाणाऱ्या रस्ता खुला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही ग्रामस्थांनी या कामास तीव्र विरोध दर्शवला .व सरकारी कामात आत्महत्येची धमकी देत अडथळा निर्माण केला.
याबाबत मंडलअधिकारी माधुरी बागले (वय ४४) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मंडल आधिकारी यांच्या म्हणण्यानुसार, ११ जुलै २०२५ रोजी तहसीलदारांनी रस्ता खुला करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, (दि. २५) मार्च रोजी दुपारी ३ वाजता ग्राममहसुल अधिकारी अनुजा घुगे, ग्राममहसुल सेवक प्रिती नानेकर, ग्राममहसुल अधिकारी रामदास आरदवाड, आदी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी जेसीबी मशीनसह संबंधित जागेवर पोहोचले.
तेव्हा पार्वतीबाई बबन उकिर्ड व त्यांच्या दोन्ही मुलांनी तसेच सुनांनी रस्ता खुला करण्यास आक्षेप घेतला. त्यांनी जेसीबी मशीनसमोर अडथळा निर्माण करत बकेटमध्ये बसून काम थांबवण्याचा प्रयत्न केला. शिवाय, “जर रस्ता खुला केला, तर आम्ही अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करू,” अशी धमकी दिली. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल संबंधितांविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात कायदेशीर कारवाईसाठी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास टाकळी हाजी औटपोस्टचे पोलीस अंमलदार शरद वारे हे करीत आहेत.
शेतकऱ्यांसाठी रस्ता खुला करत असताना न्यायप्रविष्ठ बाब नसताना जर कुणी तो अडवण्याचा प्रयत्न केला तर अशाच प्रकारची कडक कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील.. शेतकऱ्यांना शेत जमिनीत जाण्यासाठी रस्ता हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे .अनेक शेतकऱ्यांना रस्ता नसल्यामुळे आपला शेतमाल त्यामुळे बाजारपेठेत नेता येत नाही. शिरूर तहसीलदार कार्यालयाकडे याबाबत अर्ज करून रस्ता मिळवता येतो. बाळासाहेब म्हस्के, तहसीलदार, शिरुर
मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…
मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…
शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…
मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…
मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…