आरोग्य

बदाम आरोग्यासाठी खूपच गुणकारी आहे

बदाम खाणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय लाभकारी असते. यामध्ये असलेल्या पोषक तत्वांच्या मुळे केस, आणि त्वचा निरोगी राहतातच, पण त्या शिवाय स्मरणशक्ती उत्तम राहावी या करिताही बदामाचे सेवन केले जाते. वास्तवात बदाम कितीदा नियमित खाल्ले जातात हा विचार करण्याजोगा मुद्दा आहे.

दररोज चार ते पाच बदामांचे सेवन केल्याने शरीराला आवश्यक ताकद, जीवनसत्वे, क्षार, आणि प्रथिनांच्या रूपाने मिळत असते. वजनावर नियंत्रण ठेवण्यापासून ते शरीरातील अशक्तपणा दूर करण्याची क्षमता बदामात असते. हृदयरोग असणाऱ्यांकरिताही बदामाचे सेवन लाभकारी आहे. यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी थोड्या पाण्यामध्ये बदाम भिजत घालावेत व सकाळी उठून ते खावेत. दररोज अश्या रीतीने बदाम खाल्ल्या नंतर होणारे फायदे आपल्याला जाणवतील. बदामाच्या नियमित सेवनाने नैराश्य दूर होऊन, मनस्थिती उत्तम राहण्यास मदत होते. तसेच बदमातील फायबर, प्रथिने आणि मॅग्नेशियम शरीराला लाभकारी आहे. विशेषतः मधुमेहींना याचा खास लाभ होतो.

बदामाच्या नियमित सेवनाने शरीरातील कोलेस्टेरोल कमी होण्यास मदत होते. तसेच यामधील कॅल्शियम, फॉस्फरस आणि इतर पोषक तत्वांमुळे हाडांना बळकटी मिळते. त्यामुळे लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच बदाम लाभकारी आहेत. ज्यांना वजन कमी करायचे असेल, त्यांनी दररोज चार ते पाच बदामाचे सेवन करावे. बदामाच्या सेवनाने भूक शमते व वारंवार काही ना काही खात राहण्याची इच्छा होत नाही. बदामाच्या सेवनाने त्वचा नितळ आणि सुंदर राहण्यास मदत होते. यामध्ये इ-जीवनसत्व प्रचुर मात्रे मध्ये असल्याने बदाम केस आणि नखे यांच्या आरोग्यासाठी देखील उपयुक्त आहेत. बदामाच्या सेवनामुळे बद्धकोष्टही दूर होण्यास मदत होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; अरणगावच्या निकिताचा संघर्ष यशस्वी; मुंबई लोहमार्ग पोलीस दलात नियुक्ती

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…

18 तास ago

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

2 दिवस ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

2 दिवस ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

2 दिवस ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

2 दिवस ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

2 दिवस ago