केस गळण्याच्या समस्येन प्रत्येकजण त्रस्त असतो. आपले केस लांबसडक, दाट असावेत असं प्रत्येकालाच वाटतं. केसांची काळजी घेण्यासाठी आणि केसांना हेल्दी बनवण्यासाठी बाजारात बऱ्याच ट्रिटमेंट्स उपलब्ध आहेत पण याचा फारचा उपयोग दिसून येत नाही. तुम्हा नैसर्गिक पद्धतीनं केस वाढवायचे असतील तर तुम्ही काही घरगुती उपाय करून केसांना लांब, दाट बनवू शकता. झोपण्याआधी काही खास पदार्थ केसांना लावून तुम्ही केसांचे आरोग्य सुधारू शकता. केस चांगले ठेवण्यासाठी केसांना शॅम्पूने घासणं टाळायला हवं, कंडीशनर लावणं टाळा, टॉवेलनं रब करून केस पुसू नका, केस ओले असताना अजिबात विंचरू नका. हेअर कलर, हेअर डाय यांसारख्या केमिकल्सचा वापर टाळा.
केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय
१) नारळाचं तेल
नारळाच्या तेलानं केसांच्या मुळांची मालिश केल्यानं केसांच्या मुळांना पोषण मिळते. ज्यामुळे केसांमध्ये मॉईश्चर टिकून राहते. केसांमध्ये कोंडा होत नाही. हलक्या गरम नारळाच्या तेलानं केसांची मालिश करा आणि रात्रभर तसंच सोडून द्या आणि सकाळी शॅम्पूने केस धुवा. या उपायानं केस मऊ, मुलायम होतील. केस तुटण्याची समस्या उद्भवणार नाही. तसंच केसांची वाढही भराभर होईल.
२) एलोवेरा जेल
एलोवेरामध्ये प्राकृतिक एंजाईम्स असतात ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते. ताजं एलोवेरा जेल स्काल्पवर लावून हळूहळू मसाज करा. रात्रभर तसंच सोडून द्या. हा घरगुती उपाय केल्यानं केसांची हरवलेली चमक परत येईल आणि केस दाट होतील.
३) कांद्याचा रस
कांद्याच्या रसात सल्फर असते. ज्यामुळे केस मुळापासून मजबूत होतात आणि नवीन केस उगवण्यास मदत होते. कांद्याचा रस काढून केसांच्या मुळांना लावल्यास केस गळण्याच्या त्रासापासून सुटका होते आणि केस वेगानं वाढतात.
४) मेथीच्या बीया
मेथीच्या बीयांमध्ये प्रोटीन आणि निकोटिनिक एसिड असते. ज्यामुळे केसांना पोषण मिळते. मेथीच्या बीया रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी याची पेस्ट बनवून केसांच्या मुळांना लावा.
५) दही आणि मध
दही आणि मधाचं मिश्रण केसांसाठी नॅच्युरल कंडिशनरप्रमाणे काम करते. दह्यात १ चमचा मध मिसळून केसांच्या मुळांना लावल्यानं या उपायाने केस सॉफ्ट, शायनी, मजबूत होतील.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…
मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…
मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…
मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…