आरोग्य

आवळ्याचा चहा पिण्याचे फायदे

चुकीच्या जीवनशैलीमुळे वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे काही घरगुती उपाय करुन निरोगी राहू शकतो. आवळा हे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. यात व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असल्याने केस, डोळे, त्वचेसाठी ते फायदेशीर आहे. आवळा रोज खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते, तसेच लठ्ठपणा दूर होतो. तसेच रोज सकाळी आवळ्याचा चहा पिण्याने देखील अनेक फायदे मिळतात. आवळा चहा प्यायल्याने पोटात साचलेली घाण बाहेर पडते. आवळा हे फळ शरीर डिटॉक्स करण्याचे काम करते.

आवळ्याचा चहा कसा बनवायचा आणि त्याचे फायदे काय

आवळा चहा बनवण्यासाठी प्रथम २ कप पाणी उकळत ठेवावे. त्यात थोडे आले किसून टाकावे. ४-५ तुळशीची पाने घालावी. आता १ चमचा आवळा पावडर पाण्यात घालून उकळू द्यावे. जेमतेम अर्धे पाणी उरले की गॅस बंद करा आणि गाळून प्या. आता चहासारखे कोमट करुन ते पिऊ शकता. चहा व्यतिरिक्त इतर कोणत्याही पेयात अशा प्रकारे आवळा पावडर वापरू शकता. सर्व प्रथम, रिकाम्या पोटी आवळा चहा प्यायल्याने वजन लवकर कमी होण्यास मदत होते. त्यामुळे शरीरात साचलेली घाण सहज निघून जाते.

आवळा चहा रोज पिण्याने पचनक्रिया मजबूत होते. यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचन सारख्या पचनाच्या समस्या दूर होतात. तसेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. याच्या मदतीने मधुमेह नियंत्रित ठेवता येतो. व्हिटॅमिन-सी ने समृद्ध आवळा चहा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतो. हा चहा चयापचय गतिमान करण्याचे काम करतो, ज्यामुळे लठ्ठपणा कमी होतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; अरणगावच्या निकिताचा संघर्ष यशस्वी; मुंबई लोहमार्ग पोलीस दलात नियुक्ती

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…

9 तास ago

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

1 दिवस ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

1 दिवस ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

1 दिवस ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

1 दिवस ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

1 दिवस ago