आरोग्य

फक्त २ रुपयांचा कापूर ठरतो केसांसाठी संजीवनी

केसे इतके गळू लागले आहेत की टक्कलच पडेल असे आपल्या प्रत्येकालाच वाटते. अशावेळी आपण केसांना अनेक महागडे उत्पादने लावतो. ज्याच्यामुळे केस आणखी गळू लागतात.

आयुर्वेदात केस गळती,कोंडा आणि केसांच्या वाढीसाठी कापूर संजीवनी मानली जाते. नारळाच्या तेलात किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळून लावल्यास केस मजबूत होतात.

केसगळती आणि केसात कोंडा असेल तर कापूरचा वापर कसा करायचा

आपले केस गळत असतील किंवा केसात कोंडा झाला असेल तर कापूर हा नैसर्गिक प्रभावी उपाय ठरु शकतो. यामध्ये अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत जे आपल्या टाळूला निरोगी बनवतात.

नारळाच्या तेलात कापूर मिसळून लावल्याने टाळूचे रक्ताभिसरण सुधारते. ज्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळती थांबते.

केसांना तेल लावण्यासाठी २ चमचे नारळाचे तेल आणि १ छोटा कापूर घाला. नंतर हलके गरम करुन थंड झाल्यावर केसांना लावा. ३० मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवा. असे आठवड्यातून दोनदा केल्यास केसगळती थांबण्यास मदत होईल.

आपले केस कोरडे असतील तर ऑलिव्ह ऑइलमध्ये कापूर मिसळून लावा. हे टाळूला मॉइश्चरायझ करते ज्यामुळे केस तुटण्यापासून आणि गळण्यापासून रोखले जाते.

(सोशल मीडियावरून साभार)

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

न्हावरे येथे विवाहितेला शिवीगाळ व मारहाण; पती, सासू-सासऱ्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके): न्हावरे (ता. शिरुर) येथील शेंडगेवस्ती परिसरात एका २३ वर्षीय विवाहित महिलेला फोनवर…

3 तास ago

जनतेच्या विश्वासाचा बुलंद कौल; विकासाच्या राजकारणावर एकनाथ शिंदेंची मजबूत छाप

मुंबई: लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ओळख सत्ता किंवा पदावरून नव्हे, तर जनतेच्या विश्वासावरून ठरते. हा…

12 तास ago

वडगाव रासाई येथे पाटबंधारे विभागाचा कालवा फोडला; अनधिकृत सायपनद्वारे पाणी वळवल्याचा आरोप

सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान; एकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा शिरुर…

12 तास ago

शालार्थ घोटाळ्यात मोठे रॅकेट उघड; शिक्षकांकडून 20 लाख, पगारातील अर्धी रक्कमही वसूल

बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे परभणी:…

1 दिवस ago

दुधातील भेसळ कशी ओळखाल? तुकाराम मुंढेंचा नागरिकांना महत्त्वाचा सल्ला

मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध…

1 दिवस ago

भारत-यूके मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रासाठी जागतिक बाजारपेठेची दारे खुली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने…

1 दिवस ago