आरोग्य

फक्त २ रुपयांचा कापूर ठरतो केसांसाठी संजीवनी

केसे इतके गळू लागले आहेत की टक्कलच पडेल असे आपल्या प्रत्येकालाच वाटते. अशावेळी आपण केसांना अनेक महागडे उत्पादने लावतो. ज्याच्यामुळे केस आणखी गळू लागतात.

आयुर्वेदात केस गळती,कोंडा आणि केसांच्या वाढीसाठी कापूर संजीवनी मानली जाते. नारळाच्या तेलात किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळून लावल्यास केस मजबूत होतात.

केसगळती आणि केसात कोंडा असेल तर कापूरचा वापर कसा करायचा

आपले केस गळत असतील किंवा केसात कोंडा झाला असेल तर कापूर हा नैसर्गिक प्रभावी उपाय ठरु शकतो. यामध्ये अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत जे आपल्या टाळूला निरोगी बनवतात.

नारळाच्या तेलात कापूर मिसळून लावल्याने टाळूचे रक्ताभिसरण सुधारते. ज्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळती थांबते.

केसांना तेल लावण्यासाठी २ चमचे नारळाचे तेल आणि १ छोटा कापूर घाला. नंतर हलके गरम करुन थंड झाल्यावर केसांना लावा. ३० मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवा. असे आठवड्यातून दोनदा केल्यास केसगळती थांबण्यास मदत होईल.

आपले केस कोरडे असतील तर ऑलिव्ह ऑइलमध्ये कापूर मिसळून लावा. हे टाळूला मॉइश्चरायझ करते ज्यामुळे केस तुटण्यापासून आणि गळण्यापासून रोखले जाते.

(सोशल मीडियावरून साभार)

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी सरकार कटिबद्ध; कुटुंबाच्या पुनर्वसनाची हमी; डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना,…

8 तास ago

विड्याचे पान सेवन करण्याची पद्धत

जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…

15 तास ago

कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर

बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…

15 तास ago

राज्यात जनगणना मोहिमेला सुरुवात; नागरिकांना ‘स्व-गणना’ची सुविधा

मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…

16 तास ago

निष्ठा, समर्पण आणि साधेपणाचा वारसा: यशवंत हाप्पे यांना काँग्रेसची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…

16 तास ago

चिमुरडीवरील अत्याचार-हत्येने पुणे हादरले; कायदा-सुव्यवस्था कोलमडली, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…

16 तास ago