केसे इतके गळू लागले आहेत की टक्कलच पडेल असे आपल्या प्रत्येकालाच वाटते. अशावेळी आपण केसांना अनेक महागडे उत्पादने लावतो. ज्याच्यामुळे केस आणखी गळू लागतात.
आयुर्वेदात केस गळती,कोंडा आणि केसांच्या वाढीसाठी कापूर संजीवनी मानली जाते. नारळाच्या तेलात किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळून लावल्यास केस मजबूत होतात.
केसगळती आणि केसात कोंडा असेल तर कापूरचा वापर कसा करायचा
आपले केस गळत असतील किंवा केसात कोंडा झाला असेल तर कापूर हा नैसर्गिक प्रभावी उपाय ठरु शकतो. यामध्ये अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत जे आपल्या टाळूला निरोगी बनवतात.
नारळाच्या तेलात कापूर मिसळून लावल्याने टाळूचे रक्ताभिसरण सुधारते. ज्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळती थांबते.
केसांना तेल लावण्यासाठी २ चमचे नारळाचे तेल आणि १ छोटा कापूर घाला. नंतर हलके गरम करुन थंड झाल्यावर केसांना लावा. ३० मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवा. असे आठवड्यातून दोनदा केल्यास केसगळती थांबण्यास मदत होईल.
आपले केस कोरडे असतील तर ऑलिव्ह ऑइलमध्ये कापूर मिसळून लावा. हे टाळूला मॉइश्चरायझ करते ज्यामुळे केस तुटण्यापासून आणि गळण्यापासून रोखले जाते.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर न्हावरे फाटा येथे मध्यरात्री धावणाऱ्या एसटी बसला एका काळ्या रंगाच्या,…
मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.…
नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक…
मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…