आरोग्य

आहार सेवन विषयक नियम

अन्न नेहमी ताजे व गरम जेवावे. असे अन्न स्वादिष्ट तर असतेच शिवाय लवकर व चांगले पचते. फारच थंड वा फारच गरम अन्न मात्र कधीच खाऊ नये.

अगदी कोरडे अन्न वा तेलातुपाने नुसते माखलेले अन्न खाऊ नये. अगदी कोरडे अन्न म्हणजे रुक्ष अन्न खावयास तर त्रास होतोच पण पचावयास देखील त्रास होतो.

अन्नाचे प्रमाण भूक व पचनशक्ती यांच्या अनुमानाने योग्य तेवढे जर ठेवले तर त्रिदोषांना कोठेही न बिघडवता तीनही दोषांचे योग्य असे पोषण करण्यास ते सक्षम ठरते.

भूक लागल्या शिवाय जेवू नये. भूक लागणे हे आधीचे जेवण पचले आहे असे समजण्याचे साधन आहे.

आधी खाल्लेले अन्न नीट पचल्या खेरीज जेवू नये, अन्यथा अन्नपाचक रसांना, आतड्यांना ताण येतो व पचनसंस्था बिघडते.

दोन परस्पर विरोधी अशा प्रकारचे अन्न एकाच वेळी व एकामागून एक असे खाऊ नये, अशाने रोगाला आमंत्रण मिळते.

अस्वच्छ जागी बसून जेवू नये, याने जंतुसंसर्ग वाढतो.

खूप भराभर जेवू नये. अशाने ठसका लागण्याचा संभव निर्माण होतो व अन्नाचा तिटकारा वाटण्याची शक्यता निर्माण होते.

अति सावकाश रेंगाळत जेवू नये, असे केल्यास जेवण तर गार होतेच शिवाय पचन मंदावते, भूक नीट भागत नाही व जेवणाचे समाधान होत नाही.

जेवताना टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप, व्हिडीओ गेम्स हे काटेकोरपणे टाळावे. यामुळे जेवणात लक्ष राहत नाही.

जेवणासारखी अत्यंत महत्वाची गोष्ट, पूर्णपणे लक्ष देऊन स्वतःसाठी काय योग्य आणि काय अयोग्य याचा विचार करून प्रसन्न मनाने भोजन करावे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शरद पवारांच्या NDA प्रवेशाच्या चर्चेला उधाण; पृथ्वीराज चव्हाणांचे आवाहन, सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NDAसोबत जाणार…

10 तास ago

उन्हाळ्यात ताक प्यावं पण कधी, दुपारी-रात्री की कधीही?

उन्हाळ्यात शरीराला आतून थंडगार ठेवण्यासाठी आपण आहारात दही - ताकाचा समावेश करतो. या दिवसांत दही…

10 तास ago

दिवसभरात आपण किती वेळा श्वास घेतो

२४ तासात मनुष्य किती वेळा श्वास घेतो? मानवी शरीर प्रत्यक्षात एखाद्या रहस्याहून कमी नाही. किंबहुना…

10 तास ago

किडनी स्टोन समस्या आणि काळजी

किडनी स्टोनचा त्रास खूप भयंकर आणि असह्य असतो. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी सोबतच कमी पाणी पिण्याची…

10 तास ago

दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? प्रताप सरनाईकांच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. शिंदे गटाचे…

10 तास ago

पोषण आहारावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अंगणवाडी सेविकेवर कारवाई; आंबेगावात प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न

पुणे : आंबेगाव तालुक्यात अंगणवाडीतील चिमुकल्यांना आणि स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जावर प्रश्न…

10 तास ago