आरोग्य

आहार सेवन विषयक नियम

अन्न नेहमी ताजे व गरम जेवावे. असे अन्न स्वादिष्ट तर असतेच शिवाय लवकर व चांगले पचते. फारच थंड वा फारच गरम अन्न मात्र कधीच खाऊ नये.

अगदी कोरडे अन्न वा तेलातुपाने नुसते माखलेले अन्न खाऊ नये. अगदी कोरडे अन्न म्हणजे रुक्ष अन्न खावयास तर त्रास होतोच पण पचावयास देखील त्रास होतो.

अन्नाचे प्रमाण भूक व पचनशक्ती यांच्या अनुमानाने योग्य तेवढे जर ठेवले तर त्रिदोषांना कोठेही न बिघडवता तीनही दोषांचे योग्य असे पोषण करण्यास ते सक्षम ठरते.

भूक लागल्या शिवाय जेवू नये. भूक लागणे हे आधीचे जेवण पचले आहे असे समजण्याचे साधन आहे.

आधी खाल्लेले अन्न नीट पचल्या खेरीज जेवू नये, अन्यथा अन्नपाचक रसांना, आतड्यांना ताण येतो व पचनसंस्था बिघडते.

दोन परस्पर विरोधी अशा प्रकारचे अन्न एकाच वेळी व एकामागून एक असे खाऊ नये, अशाने रोगाला आमंत्रण मिळते.

अस्वच्छ जागी बसून जेवू नये, याने जंतुसंसर्ग वाढतो.

खूप भराभर जेवू नये. अशाने ठसका लागण्याचा संभव निर्माण होतो व अन्नाचा तिटकारा वाटण्याची शक्यता निर्माण होते.

अति सावकाश रेंगाळत जेवू नये, असे केल्यास जेवण तर गार होतेच शिवाय पचन मंदावते, भूक नीट भागत नाही व जेवणाचे समाधान होत नाही.

जेवताना टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप, व्हिडीओ गेम्स हे काटेकोरपणे टाळावे. यामुळे जेवणात लक्ष राहत नाही.

जेवणासारखी अत्यंत महत्वाची गोष्ट, पूर्णपणे लक्ष देऊन स्वतःसाठी काय योग्य आणि काय अयोग्य याचा विचार करून प्रसन्न मनाने भोजन करावे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात गायरान जमिनीवर वृक्षारोपण करण्याबाबत उदघाट्न कार्यक्रमा दरम्यान वाद

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील तब्बल ५४ एकर गायरान जमिनीवर वृक्षारोपण करण्याच्या…

9 तास ago

डिप्रेशन दूर करण्यासाठी उपाय

१) डिप्रेशन म्हणजे वेड नव्हे. याबद्दल संकोच, कमीपणा बाळगू नये. आपल्याला डिप्रेशन (नैराश्य) आले आहे,…

11 तास ago

शिरुरमध्ये सोने मोजन्याच्या वजन काट्याचा वापर आता एमडी ड्रग्ज मोजण्यासाठी…?

शिरुर (तेजस फडके): पुणे जिल्ह्यासह राज्यभरात थैमान घालणाऱ्या ‘एमडी’ (मेफेड्रोन) या घातक अंमली पदार्थाचे सावट…

12 तास ago

ब्रेन स्ट्रोक म्हणजे काय

स्ट्रोक हे भारतातील मृत्यूचे प्रमुख कारण बनले आहे. हा एक धोकादायक रोग आहे ज्यावर तात्काळ…

13 तास ago

प्रबोध डावखरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

मुंबई: कै. वसंत डावखरे यांचे चिरंजीव प्रबोध डावखरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि…

13 तास ago

मुंबईच्या ‘लालपरी’ची वेदना! बेस्टच्या निवृत्त कामगारांना न्याय कधी?

मुंबई: मुंबईची ओळख म्हटलं की लोकलसोबत डोळ्यांसमोर उभी राहते ती लाल रंगाची बेस्ट बस. पावसात,…

16 तास ago