फोनवर बोलताना इअरफोन लावावे
खूप जास्त वेळ फोनवर बोलावे लागत असेल तर फोन हातात पकडून, गाल चिकटवून बोलण्यापेक्षा हेडफोन्स किंवा इअरफोन्स वापरावेत. त्यामुळे मोबाईलच्या रेडिएशनमुळे बचाव होईल. तसेच मान किंवा खांद्यांच्या वेदनांची समस्या भेडसावणार नाही.
वाकून काम करू नका
ऑफिसमध्ये काम करताना कॉम्प्युटरवर काम करत असाल तर शरीर झुकवून काम करू नये. आपल्या कॉम्प्युटर स्क्रीनची उंची डोळ्याच्या उंचीइतकी ठेवावी. जेणेकरून शरीर आणि मान खालच्या बाजूला वाकू नये. वाकून काम केल्याने मानेच्या वेदना होतातच; पण भविष्यात मणक्याच्या हाडांशी निगडीत समस्या निर्माण होतात.
उंच उशीचा वापर नको
झोपताना उंच उशीचा वापर करीत असाल तर मानदुखी होऊ शकतो. वेदना होत असल्यास झोपताना उशी घेऊ नये. उशी वापरायची असेल तर विशेष स्वरूपाच्या सर्व्हायकल उशांचा वापर करावा. ही उशीदेखील अतिउंच नसावी किंवा अतिपातळही नसावी. या उशीचा वापर करून मानेला आराम मिळाला पाहिजे.खुर्ची आणि सोफा यावर योग्य पद्धतीने बसा : खुर्ची आणि सोफ्यावर आडवे-तिडवे बसू नका. त्यामुळे मानेच्या समस्या होतात. खुर्ची किंवा सोफ्यावर बसताना योग्य पद्धतीने बसावे. शक्यतो कायम ताठ बसावे, तसेच खुर्चीवर एकाच पद्धतीने बराच काळ बसू नये. मानेच्या स्नायूंना आराम मिळण्यासाठी अधूनमधून थोडा वेळ आराम करावा, मानेचे व्यायाम करावेत.
मान दुखू लागल्यास बर्फाने शेकावे
मानदुखीमध्ये बर्फाने शेकल्यास लवकर आराम पडतो. त्यासाठी बर्फाचे तुकडे कापडात बांधून वेदना होणार्या जागी शेकावे. त्यामुळे सूज कमी होते. मान दुखत असल्यास मानेचे लिंगामेेट आणि स्नायू यांनाच इजा होते. इजेपासून आराम मिळण्यासाठी मानेला आराम द्यावा. त्यामुळे इजा झाल्यानंतर कॉलरचा वापर करावा. जेणेकरून मान वळवताना लागणार्या झटक्यांपासून मानेचे संरक्षण करता येईल.
मसाज आणि शेकणे
मानेच्या वेदना होत असतील तर कोमट तेलाने मालिश करावे. त्यामुळे आराम मिळतो. मालिश करताना नेहमीच मानेकडून खांद्याच्या दिशेने करावी. मालिश केल्यानंतर गरम पाण्याच्या पिशवी किंवा काचेच्या बाटलीत गरम पाणी भरून शेकावे. शेकल्यानंतर मोकळ्या हवेत जाऊ नये किंवा थंड पाणी पिऊ नये.
(सोशल मीडियावरून साभार)
सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…
अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…
आजकाल शरीरात यूरिक अॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…
पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…
मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…