आरोग्य

उपवास करता, पण दुप्पट खाता? -असं तर तुमचं होत नाही ना, पाहा उपवास ‘कसा’ करायला हवा

आपण सगळे भारतीय संस्कृतीत वाढलो आहोत. आपली संस्कृती कितीतरी हजार वर्ष जुनी आहे व पिढ्यानपिढ्या आपण ती जपत आलो आहोत. प्रत्येक सणाला प्रत्येक ऋतुला व प्रत्येक उपवासाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. “अन्न हे पूर्ण ब्रह्म ” असे म्हटले आहे. पूर्ण सकस आहार घेणे रोज घेणे हे जसे शरीरसौष्ठवासाठी महत्त्वाचे आहे व गरजेचे आहे तेवढेच गरजेचे आहे ते शरीर आतून स्वच्छ करणे व त्याला एक ऊर्जा देणे आणि यासाठीच आपल्या संस्कृतीत उपवास हा एक महत्त्वाचा संस्कार आहे.

जसा निसर्गाला बदल अनिवार्य आहे तसाच शरीराला पण बदल हवा असतो. जसे मनाला व मेंदूला शांतता व नवीन ऊर्जेची गरज असते तेव्हा आपण रोजच्या दिनचर्येला ब्रेक देऊन जागा बदलतो किवा योग, ध्यान या माध्यमातून एक ऊर्जा व नावीन्य देतो त्याचप्रमाणे शरीराला नावीन्य व ऊर्जा देण्यासाठी उपवास अतिशय महत्त्वाचा असतो.

लेखाच्या प्रारंभी दिलेल्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे “उपवास” या शब्दाची फोड अशी आहे-‘उप’ म्हणजे जवळ आणि ‘वास’ म्हणजे राहणे. धार्मिक अर्थाप्रमाणे देवाच्या जवळ राहणे म्हणजे उपवास. धार्मिक सण, पूजाअर्चा अशी घाई असलेल्या या दिवशी अन्न शिजविण्यामध्ये वेळ जाऊ नये व देवाला जास्तीत जास्त वेळ देण्यासाठी उपवास केला जातो. अन्न-पाणी वर्ज्य करून राहणे म्हणजे उपवास. सामान्यपणे उपवासाचा अर्थ म्हणजे हलका वा मीत आहार घेणे. उपवास म्हणजे दैनंदिन आहार वर्ज्य करून शरीर शुद्धी करण्याचा एक नैसर्गिक व आयुर्वेदिक उपचार. तपाच्या निरनिराळ्या प्रकारात ‘उपवास’ हा सर्वश्रेष्ठ असे महाभारतामध्ये नमूद आहे.

उपवास हे निसर्गाने दिलेले एक वरदान आहे आणि दुर्दैव असे की हे आपण विसरत चाललो आहोत.

1) एकादशी आणि दुप्पट खाशी असंच आपल्याकडे असतं. उपवासाच्या दिवशी घरात साबुदाणा, बटाटे, रताळं, बटाटा पापड, बटाटा किस, तळलेले शेंगदाणे, उपवासाचे थालीपीठ, दाण्याची आमटी, चिप्स, ड्रायफ्रूट, भगर, मिल्कशेक असे अनेकानेक पदार्थ बनवायची नुसती लगबग असते….आणि इथेच आपण चुकतो….उपवास हा एक संस्कार म्हणून न घेता त्याला सणाचं रूप देतो.

2) उपवास करताना तो शक्यतो फक्त पाण्यावर करावा किवा निसर्गाने बहाल केलेला उत्तम पर्याय म्हणजे फळं .फळांमध्ये नैसर्गिक साखर (ग्लुकोज ) असल्याने शरीराला ताकद व ऊर्जा मिळते. बाकीचे सर्व पदार्थ म्हणजे जिभेचे चोचले आहेत.

3) ज्यांना असा उपवास सहन होत नाही त्यांच्यासाठी भगर आणि रताळं हे उत्तम उपाय आहेत. भगरीमध्ये कॅल्शियम, लोह, फॉस्फरस मुबलक असतं, त्यामुळे भगर पचायला अतिशय हलकी असते. वजन कमी होण्यास मदत होते, हाडांना मजबुती मिळते, ऊर्जेची पातळी वाढते, मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी भगर हे एक परिपूर्ण अन्न आहे.

दुसरा पर्याय

रताळं…जीवनसत्वयुक्त रताळ्यात भरपूर प्रमाणात फायबर असतं. हे उकडून खाल्याने त्यातील बहुतांश पोषक मूल्य टिकून राहतात.

4) उपवासाला साबुदाणा शक्यतो टाळावा. तो पचायला जड असतो.

5) प्रत्येकाची ताकद व शरीररचना भिन्न भिन्न असल्याने आपल्याला सहन होईल असाच आहार उपवासाला घ्यावा. दही, ताक, भगर, रताळे आणि फळं यांचा आहारात समावेश असावा.

काय करायला हवे

1) उपवास उपवास म्हणून खूप घोळ घालू नका. हलकं अन्न घ्या आणि भरपूर पाणी प्या.

2) आपल्याला किती आहार लागतो हे तुमचं तुम्हाला समजलं पाहिजे. खूप खाणं टाळा; पण त्याचबरोबर योग्य ते खा.

3) दीर्घायुषी व निरोगी राहण्यासाठी निसर्गाने आपल्याला उपवास हे रामबाण औषध दिलेलं आहे हे कायम लक्षात ठेवा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

7 तास ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

8 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

8 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

8 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

8 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

8 तास ago