आरोग्य

उन्हाळ्यात प्या काकडीचे डिटॉक्स वॉटर, ५ मिनिटांचे काम-पोटाला आराम आणि पोटावरची चरबीही गायब

पोटाच्या समस्यांचे प्रमाण फार वाढले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे असेल किंवा खाण्याच्या सवयींमुळे. जेवणाच्या वेळा पाळल्या जात नाहीत. त्यामुळेही त्रास होतो. बाहेरचे तेलकट पदार्थ भरपूर खाल्ले जातात. तसेच स्थुलतेच्या समस्याही वाढल्या आहेत. पोटाचे आजार, सातत्याने वाढणारे वजन कमी करण्यासाठी एक रामबाण उपाय आहे. तो म्हणजे डिटॉक्स वॉटर. फारच सोपा उपाय आहे. पाहा किती उपयुक्त असते हे पाणी.

डिटॉक्स म्हणजे नेमकं काय असत

डिटॉक्सही शरीरातील घाण बाहेर काढण्याची प्रक्रिया आहे. शरीराला हानिकारक किंवा गरजेचे नसलेले पदार्थ शरीराबाहेर मलमुत्रावाटे टाकून देण्याची ही प्रक्रिया आरोग्यासाठी फार उपयुक्त असते.

पचनसंस्था सुरळीत चालावी यासाठी डिटॉक्स गरजेचे असते. शरीरातील टॉक्सिन्स शरीराबाहेर गेले नाहीत तर पचन, यकृत, आतडे आदी अवयवांचे आजार उद्भवतात.

डिटॉक्स वॉटर तयार करायची कृती

हे डिटॉक्स वॉटर तयार करणं अगदीच सोपं आहे. तसेच त्याचे विविध प्रकारही असतात. त्यापैकी एक प्रकार अगदीच साध्या सामग्रीचा वापर करून तयार करता येतो. रोज सकाळी मोठ्या बाटलीमध्ये असे पाणी तयार करून ठेवायचे. मग दिवसभर पित राहायचे. अगदी ५ मिनिटांचे काम आहे.

 

 

१) एका काकडीचे गोल गोल काप करून घ्या. काकडीची सालं काढू नका. त्यांच्यामध्ये पोषकतत्वे असतात.

२) एक लिंबूही तसाच गोल गोल चिरून घ्या.

3) एक लहान आलं घ्या. त्याचेही गोल काप करून घ्या.

४) आता काकडी, लिंबू, आलं एका बाटलीमध्ये टाका. त्यामध्ये पाणी भरून घ्या. पुदिन्याची पाने त्यामध्ये टाका. बाटलीचे झाकण बंद करून ठेवा.

५) ३ ते ४ तासांमध्ये डिटॉक्स वॉटर तयार होईल.

उन्हाळ्याच्या दिवसांसाठी उत्तम पेय 

काकडी शरीराला हायड्रेटेड राहण्यासाठी मदत करते. काकडीमध्ये कॅलरीजही खुप कमी असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी काकडीचा उपयोग होतो. लिंबामध्ये जीवनसत्त्व ‘सी’ भरपूर प्रमाणात असते.

तसेच त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. त्वचेसाठी लिंबू फारच उपयुक्त ठरते. आलं पचन सुधारते. पोटातील अडकलेला गॅस बाहेर काढते. चरबी कमी करण्यासाठी मदत करते. पुदिना हा पाचक पदार्थ आहे. पुदिन्यामध्ये जीवनसत्त्व ‘ए’, ‘बी’, ‘सी ‘असतात. तसेच इतरही अनेक घटक असतात. या सर्व पदार्थांचे मिश्रण असलेले पाणी शरीरासाठी चांगेलच. उन्हाळ्यामध्ये तर अतिउत्तम.

 

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील शब्दवीर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा टोकदार वार

मुंबई: “मुंबई महाराष्ट्राची कधीच होणार नाही!” ही घोषणा त्या काळातील केवळ राजकीय भूमिका नव्हती, तर…

1 तास ago

ठाण्यात पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस सुरू; प्रवास होणार अधिक सुखकर

ठाणे: ठाणे महानगरातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ…

1 तास ago

सातारा जिल्ह्याला राज्यात अव्वल करण्यासाठी कटिबद्ध; पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा: महाराष्ट्राच्या प्रगतीचा पाया घालणारे यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत…

1 तास ago

महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली; आम्ही ती वेगाने कनेक्ट केली; एकनाथ शिंदे

रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…

1 दिवस ago

पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा सत्ताधा-यांचा डाव; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…

1 दिवस ago

१०७ हुतात्म्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कुठे? कामगार, भाषा आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…

1 दिवस ago