CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 75?
तूप:- आपल्याला वाटते की, तूप कॅलरीज वाढवते पण तुपाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यावर शरीरातील खराब चरबी कमी होते आणि तुमचे शरीर उबदार ठेवण्यास मदत मिळते.
गूळ:- पचनक्रिया सुधारण्यासाठी गूळ हा अत्यंत फायदेशीर पदार्थ आहे, जो आपल्याला हिवाळ्यात उबदार ठेवतो.
गरम सूप:- हिवाळ्यात सायंकाळी एक वाटी गरम सूप प्यायला कोणाला आवडत नाही? झटपट उब मिळविण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
सुका मेवा:- हिवाळ्यात सुका मेवा हा एक उत्तम पर्याय असतो. अॅप्रिकोट, अंजीर व खजूर हे नैसर्गिक उबदारपणा देतात.
केशर:- जर तुम्हाला हिवाळ्यात तुमचे शरीर उबदार ठेवायचे असेल, तर तज्ज्ञांच्या मते, दुधात केशर उकळून, त्यात मनुके टाकावेत.
धान्य:- बाजरी, नाचणी यांसारख्या धान्यांचा हिवाळ्यात तुम्ही आस्वाद घेऊ शकता.
दालचिनी:- दालचिनी ही शरीराच्या चयापचय क्रिया सुधारण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दालचिनीच्या सेवनाने शरीरात उष्णता निर्माण करण्यास मदत होते आणि म्हणूनच हिवाळ्यात दालचिनीचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.
तीळ:- तीळ हे श्वसनाशी संबंधित अनेक आजार दूर ठेवण्यास मदत करतात. तिळाचे लाडू, तिळाची बर्फी इत्यादी स्वादिष्ट पदार्थांचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता.
तुळशी आणि आले:- तुम्ही कधी चहामध्ये आले आणि तुळशीचे पाने टाकून पाहिले आहे का? एकदा करून पाहा. आले आणि तुळशीच्या पानांचा चहा अत्यंत आरोग्यदायी आहे.
मध: हिवाळ्यात सर्दी आणि फ्ल्यूचा सामना करण्यासाठी मध हा अत्यंत उपयुक्त आहे. न्युट्रिशनिस्ट करिश्मा चावला सांगतात, “मध थोड्या प्रमाणात खावा. कारण- त्यात कॅलरीज जास्त आहेत.” त्या पुढे सांगतात, “काजू, बिया, कांदे, लसूण, सफरचंद आणि इतर फळे, कच्चे सॅलड, मोड आलेली कडधान्ये फायबर आणि प्रथिनयुक्त असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. अँटिऑक्सिडंट्स, झिंक, चांगली चरबी असलेले पदार्थ खावेत.
(सोशल मीडियावरून साभार)
शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…
नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…
शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…
सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…
रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत…
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत असून त्यांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कारच दिला…