आरोग्य

डोळ्यांची दृष्टी चांगली ठेवण्यासाठी खा ‘या’ गोष्टी

रताळे:- रताळे आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असतात. यांमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर असतं जे डोळ्यांच्या दृष्टीसाठी चांगलं असतं. व्हिटॅमिन ए शरीरात कमी झालं तर डोळ्यांसंबंधी समस्या होतात. रताळ्याच्या सेवनाने डोळ्यांचा कोरडेपणा कमी होतो आणि रेटिनाची दृष्टी वाढते. डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी रताळ्यामध्ये बीटा कॅरोटीनही भरपूर असतं.

गाजर:- गाजर आपल्या डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करतात. गाजरामध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असतं. या दोन्ही तत्वांमुळे डोळ्यांची दृष्टी वाढते. यानी डोळ्यांच्या सेल्स वाढतात. गाजराचा ज्यूस रोज सेवन केल्यास डोळे चांगले राहतात. तसेच तुम्ही गाजर जेवणासोबत सलाद म्हणूनही खाऊ शकता.

आवळा:- आयुर्वेदात आवळ्यात फार महत्वाची औषधी मानलं जातं. आवळे डोळ्यांसाठी अमृतासमान असतात. आवळ्यांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं. ज्याने डोळ्यांच्या मसल्स मजबूत होतात आणि डोळ्यांमधील ब्लड फ्लोही सुरळीत होतो. रोज रिकाम्या पोटी आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने डोळ्यांची दृष्टी वाढते. तसेच वाढत्या वयासोबत होणाऱ्या डोळ्यांच्या समस्याही कमी होतात.

पपई:- पपईमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं. पपई आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असते. पपईचं नियमितपणे सेवन केल्याने डोळ्यांना नुकसानकारक किरणांपासून वाचवलं जातं. पपई तुम्ही नाश्त्यात खाऊ शकता. पपई स्मूदी सेवन करू शकता. डोळ्यांची जळजळ आणि सूज पपईने दूर होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

8 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

14 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

14 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

14 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

15 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

2 दिवस ago