आरोग्य

पावसाळ्यात दुधाचा चहा प्यायल्याने काय होतं नुकसान? घ्या जाणून…

पावसाळ्यात गरमा गरम चहा अनेकजण पित असतात. बाजारात चहाचे वेगवेगळे प्रकार आले असतील तरी दुधाचा चहा पिणं ही अनेकांची सवय आहे. जास्तीत जास्त लोक दुधाचा चहा घेतात. तसा तर चहा कोणत्याही ऋतूमध्ये लोक न विसरता पितात. मात्र, पावसाळा आला की, लोक जास्त चहा पितात. म्हणजे पावसाच्या रिमझिम धारा आणि गरमागरम चहा हे कॉम्बिनेशन लोकांना खूप आवडतं. पण एक्सपर्ट सांगतात की, पावसाळ्यात दुधाचा चहा जास्त प्यायल्याने तुम्हाला अनेक समस्या होऊ शकतात. त्या काय ते जाणून घेऊयात…

पचनासंबंधी समस्या
पावसाळ्यात दुधाचा चहा जास्त प्यायल्याने गॅस, ब्लोटिंग आणि अॅसिडिटीसारख्या समस्या होतात. पावसाळ्यात आधीच पचन तंत्र कमजोर झालेलं असतं. अशात जर तुम्ही जास्त चहा घेतला तर पोटासंबंधी अनेक समस्या वाढू शकतात. ज्या लोकांना आधीच अॅसिडिटी किंवा गॅसची समस्या आहे त्यांना तर दुधाचा चहा अजिबात न पिण्याचा सल्ला दिला जातो.

हाडं कमजोर होतात
दुधाच्या चहामध्ये टॅनिन आणि कॅफीन भरपूर असतं जे शरीरात कॅल्शिअमच्या अवशोषणात अडथळा आणतात. याचा हाडांवर प्रभाव पडतो. जास्त चहा घेतल्याने हाडे कमजोर होतात आणि ऑस्टियोपोरोसिसचा धोकाही वाढतो.

झोप खराब होते
चहामध्ये कॅफीनचं प्रमाण जास्त असतं जे पचन तंत्र बिघडवतं. जास्त प्रमाणात कॅफीनचं सेवन केल्याने झोप न येण्याची किंवा झोपेची क्वालिटी बिघडते. खासकरून रात्री चहा प्यायल्याने झोप खराब होते. सकाळी झोपेतून उठल्यावर थकवा जाणवतो.

दात खराब होतात
दुधाच्या चहामध्ये असलेली साखर दातांसाठी नुकसानकारक ठरू शकते. चहा जास्त प्यायल्याने दातांना किट लागते आणि त्यावर पिवळा थर जमा होतो. त्याशिवाय चहामधील टॅनिनमुळे दातांवर पिवळे डाग येतात.

वजन वाढतं
पावसाळ्यात शारीरिक हालचाल कमी होते. अशात दूध आणि साखरेचा चहा सेवन केल्याने कॅलरी जास्त मिळतात. त्यामुळे या दिवसात शारीरिक हालचाल कमी होत असल्याने कॅलरी बर्न करणं अवघड होतं. कॅलरी बर्न झाल्या नाही तर वजन वाढतं.

काय घ्याल काळजी
– पावसाळ्यात दुधाच्या चहाचं सेवन कमी करा.
– चहामध्ये साखर कमी टाका आणि जास्त वेळ चहा उकळू नका.
– चहामध्ये आलं, तुळशीची पाने आणि वेलची टाका.
– जर चहा जास्त पित असाल तर पाणीही भरपूर प्या.

घरातील झुरळ कसे बाहेर काढाल? सोपे उपाय पाहा…

दिवसभरात किती कप कॉफी पिणं योग्य? घ्या जाणून…

मिक्स्ड फ्रूट ज्यूस पिताय तर जरा थांबा; शरिरासाठी ठरू शकते घातक…

कोमट पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का?; घ्या जाणून…

डेंग्यू झाल्यावर रूग्णानी काळजी कशी घ्यावी? घ्या जाणून…

मूग डाळीचं पाणी पिण्याचे फायदे

साखरेपेक्षा खडीसाखरेला आहे जास्त महत्व, पहा फायदे 

पीत्त होण्याची कारणे आणि उपाय…

बडिशेप हे पचनसंस्थेसाठी उत्तम औषध

कोथिंबीर, कांदा, लसूण यांचे आरोग्यासाठी मोठे फायदे 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘सिद्धिविनायक चोरीप्रकरणी मला माहिती नाही’; बांकीपूर पराभवानंतर संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपच्या पराभवावरून केंद्र…

7 मिनिटे ago

खड्ड्याने घेतला टीडीआरएफ जवानाचा जीव! अनेकांचे प्राण वाचवणारा विकास गोरे काळाच्या पडद्याआड

अपघातानंतरच खड्डा बुजवला; पत्नीचा हृदयद्रावक आक्रोश, दोषींवर गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी ठाणे : संकटाच्या…

11 मिनिटे ago

पेट्रोल-डिझेल निर्यात महागली! केंद्राचा मोठा निर्णय; ATF वरही शुल्कवाढ

पेट्रोल, डिझेल आणि जेट इंधनावरील निर्यात शुल्कात वाढ; 3 ऑगस्टपासून नवे दर लागू, सर्वसामान्यांवरील किरकोळ…

1 तास ago

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का! श्रीकांत शिंदेंविरोधात लढलेल्या वैशाली दरेकर-राणेंचा राजीनामा

मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आणखी एक राजकीय धक्का बसला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून…

1 तास ago

‘सावजी’वरून तुकाराम मुंढे वादाच्या भोवऱ्यात; माफी मागा, अन्यथा मानहानीचा दावा; सावजी समाजाचा इशारा

मुंढेंच्या वक्तव्याने नागपुरात संताप; आहारतज्ज्ञांनीही तेलाचे प्रमाण कमी ठेवण्याचा दिला सल्ला मुंबई: अन्न व औषध…

1 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोगाची नोटीस; पक्षघटनेतील बदलांवर मागवली महत्त्वाची कागदपत्रे

सुनेत्रा पवार यांना आयोगाचे पत्र; कलम ६, ७, १२, ३२ आणि ३६ मधील दुरुस्त्यांबाबत वैध…

1 तास ago