आरोग्य

पावसाळ्यात दुधाचा चहा प्यायल्याने काय होतं नुकसान? घ्या जाणून…

पावसाळ्यात गरमा गरम चहा अनेकजण पित असतात. बाजारात चहाचे वेगवेगळे प्रकार आले असतील तरी दुधाचा चहा पिणं ही अनेकांची सवय आहे. जास्तीत जास्त लोक दुधाचा चहा घेतात. तसा तर चहा कोणत्याही ऋतूमध्ये लोक न विसरता पितात. मात्र, पावसाळा आला की, लोक जास्त चहा पितात. म्हणजे पावसाच्या रिमझिम धारा आणि गरमागरम चहा हे कॉम्बिनेशन लोकांना खूप आवडतं. पण एक्सपर्ट सांगतात की, पावसाळ्यात दुधाचा चहा जास्त प्यायल्याने तुम्हाला अनेक समस्या होऊ शकतात. त्या काय ते जाणून घेऊयात…

पचनासंबंधी समस्या
पावसाळ्यात दुधाचा चहा जास्त प्यायल्याने गॅस, ब्लोटिंग आणि अॅसिडिटीसारख्या समस्या होतात. पावसाळ्यात आधीच पचन तंत्र कमजोर झालेलं असतं. अशात जर तुम्ही जास्त चहा घेतला तर पोटासंबंधी अनेक समस्या वाढू शकतात. ज्या लोकांना आधीच अॅसिडिटी किंवा गॅसची समस्या आहे त्यांना तर दुधाचा चहा अजिबात न पिण्याचा सल्ला दिला जातो.

हाडं कमजोर होतात
दुधाच्या चहामध्ये टॅनिन आणि कॅफीन भरपूर असतं जे शरीरात कॅल्शिअमच्या अवशोषणात अडथळा आणतात. याचा हाडांवर प्रभाव पडतो. जास्त चहा घेतल्याने हाडे कमजोर होतात आणि ऑस्टियोपोरोसिसचा धोकाही वाढतो.

झोप खराब होते
चहामध्ये कॅफीनचं प्रमाण जास्त असतं जे पचन तंत्र बिघडवतं. जास्त प्रमाणात कॅफीनचं सेवन केल्याने झोप न येण्याची किंवा झोपेची क्वालिटी बिघडते. खासकरून रात्री चहा प्यायल्याने झोप खराब होते. सकाळी झोपेतून उठल्यावर थकवा जाणवतो.

दात खराब होतात
दुधाच्या चहामध्ये असलेली साखर दातांसाठी नुकसानकारक ठरू शकते. चहा जास्त प्यायल्याने दातांना किट लागते आणि त्यावर पिवळा थर जमा होतो. त्याशिवाय चहामधील टॅनिनमुळे दातांवर पिवळे डाग येतात.

वजन वाढतं
पावसाळ्यात शारीरिक हालचाल कमी होते. अशात दूध आणि साखरेचा चहा सेवन केल्याने कॅलरी जास्त मिळतात. त्यामुळे या दिवसात शारीरिक हालचाल कमी होत असल्याने कॅलरी बर्न करणं अवघड होतं. कॅलरी बर्न झाल्या नाही तर वजन वाढतं.

काय घ्याल काळजी
– पावसाळ्यात दुधाच्या चहाचं सेवन कमी करा.
– चहामध्ये साखर कमी टाका आणि जास्त वेळ चहा उकळू नका.
– चहामध्ये आलं, तुळशीची पाने आणि वेलची टाका.
– जर चहा जास्त पित असाल तर पाणीही भरपूर प्या.

घरातील झुरळ कसे बाहेर काढाल? सोपे उपाय पाहा…

दिवसभरात किती कप कॉफी पिणं योग्य? घ्या जाणून…

मिक्स्ड फ्रूट ज्यूस पिताय तर जरा थांबा; शरिरासाठी ठरू शकते घातक…

कोमट पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का?; घ्या जाणून…

डेंग्यू झाल्यावर रूग्णानी काळजी कशी घ्यावी? घ्या जाणून…

मूग डाळीचं पाणी पिण्याचे फायदे

साखरेपेक्षा खडीसाखरेला आहे जास्त महत्व, पहा फायदे 

पीत्त होण्याची कारणे आणि उपाय…

बडिशेप हे पचनसंस्थेसाठी उत्तम औषध

कोथिंबीर, कांदा, लसूण यांचे आरोग्यासाठी मोठे फायदे 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

8 तास ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

8 तास ago

गांधी हत्या समर्थन असंस्कृत; जैन मुनीच्या वक्तव्यावर सपकाळ यांचा संताप

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी राष्ट्रपिता Mahatma Gandhi यांच्या हत्येचे समर्थन…

9 तास ago

मुंबईत वाढत्या ड्रग्ज व्यापारावर कारवाईची मागणी; ‘ड्रगमुक्त मुंबई’ अभियान राबविण्याचा आग्रह

मुंबई: मुंबई शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते…

9 तास ago

प्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार काळाच्या पडद्याआड

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सुप्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार (वय ७५ वर्षे) यांचे दीर्घ…

9 तास ago

महिला आरक्षणावर भाजपाला अधिकार नाही; RSS मध्ये महिला सरसंघचालक नेमून दाखवा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…

18 तास ago