१) लिंबु अर्धे कापून त्यावर काळी मिरी पूड व मीठ शिंपडून ते चोखल्यास कफाची तीव्रता कमी होते. तुळस+बडिशेपचा काढाही खोकल्यावर उपयुक्त आहे. हिवाळ्यात रोजच्या जेवणा त लसणाच्या २-३ पाकळ्यांचा समावेश केल्यास खोकला होण्याची शक्यता फार कमी असते. उकळत्या पाण्यात निलगिरीची व पुदिन्याची काही पाने टाकुन त्याचा वाफारा घ्यावा.हळकुंड भाजुन त्याची पावडर करून ती रोज घ्यावी.
२) चमचाभर शुद्ध मधात चिमुटभर पांढरी मिरी पावडर टाकून दिवसातुन ३ वेळा असे ४-५ दिवस घेतल्यास खोकला कमी होतो. काळी मिरी पूड+सुंठ पूड यांचे मिश्रण मधातुन दिवसातुन २-३ वेळा घेतल्यास खोकल्या पासुन आराम मिळतो. आवळा पूड+मध यांचे मिश्रण तसेच द्राक्षाचा रस + मध यांचे मिश्रणही फायदेशीर ठरते.
३) रोज द्राक्षांचे सेवन केल्याने साधा सर्दी-खोकला लगेच बरा होतो.यामुळे फुफ्फुसाचे कार्य सुधारते व कफ शरीराबाहेर पडण्यास मदत होते. पाव????मिरीपूड, पाव????, सुंठपूड, १????मध हे सर्व २ ????पाण्यात मिसळा. खोकल्याची उबळ आल्यावर हे मिश्रण घेतल्यास लगेच आराम मिळतो.
४) पालकाच्या कोमट रसाने गुळण्या केल्यास कोरड्या खोकल्याचा त्रास कमी होतो. अर्धा????खसखस पेस्ट,३-४????नारळाचे दुध,चमचाभर मध हे मिश्रण रोज रात्री झोप ताना घेतल्यास कोरडा खोकला कमी होतो. सकाळी उठल्याबरोबर १ किंवा २ ग्लास कोमट पाणी प्या. जेवणानंतरही गरम पाणी घ्यावे.
५) १०० ग्रॅ पाण्यात भिजवले ली द्राक्षे तेवढ्याच साखरेत शिजवुन त्याचा सॉस बनवुन ठेवा.झोपण्यापुर्वी २ चमचे हा सॉस घेतल्याने खोकल्याची ढास येत नाही. कोरड्या खोकल्यावर बदाम रामबाण औषध आहे. पाण्यात भिजवलेले बदाम सोलुन त्याची पेस्ट करून ती सकाळ संध्या लोणी-साखरेत मिसळुन घ्यावी. खोकल्याबरोबरच श्वसनसं स्थेतील इतर बिघाड थोपवण्या साठी रोज ४ तुळशीची पाने ४ मिरी बरोबर चघळावीत.
६) कांद्याचा रस व मध यांचे मिश्रण उत्कृष्ट कफसिरप आहे. उकळत्या पाण्यात १ मध्यम आकाराचा चिरलेला कांदा, एका लिंबाचा रस आणि मध यांचे मिश्रणही असेच काम करते. यामुळे खोकल्यापासून तात्काळ आराम मिळतो. कपभर उकळत्या पाण्यात चमचाभर मार्जोरम(कुठरा) घालुन १५-२० मिनिटे तसेच ठेवा व नंतर त्याचे सेवन करावे.
(सोशल मीडियावरुन साभार)
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…