१) लिंबु अर्धे कापून त्यावर काळी मिरी पूड व मीठ शिंपडून ते चोखल्यास कफाची तीव्रता कमी होते. तुळस+बडिशेपचा काढाही खोकल्यावर उपयुक्त आहे. हिवाळ्यात रोजच्या जेवणा त लसणाच्या २-३ पाकळ्यांचा समावेश केल्यास खोकला होण्याची शक्यता फार कमी असते. उकळत्या पाण्यात निलगिरीची व पुदिन्याची काही पाने टाकुन त्याचा वाफारा घ्यावा.हळकुंड भाजुन त्याची पावडर करून ती रोज घ्यावी.
२) चमचाभर शुद्ध मधात चिमुटभर पांढरी मिरी पावडर टाकून दिवसातुन ३ वेळा असे ४-५ दिवस घेतल्यास खोकला कमी होतो. काळी मिरी पूड+सुंठ पूड यांचे मिश्रण मधातुन दिवसातुन २-३ वेळा घेतल्यास खोकल्या पासुन आराम मिळतो. आवळा पूड+मध यांचे मिश्रण तसेच द्राक्षाचा रस + मध यांचे मिश्रणही फायदेशीर ठरते.
३) रोज द्राक्षांचे सेवन केल्याने साधा सर्दी-खोकला लगेच बरा होतो.यामुळे फुफ्फुसाचे कार्य सुधारते व कफ शरीराबाहेर पडण्यास मदत होते. पाव????मिरीपूड, पाव????, सुंठपूड, १????मध हे सर्व २ ????पाण्यात मिसळा. खोकल्याची उबळ आल्यावर हे मिश्रण घेतल्यास लगेच आराम मिळतो.
४) पालकाच्या कोमट रसाने गुळण्या केल्यास कोरड्या खोकल्याचा त्रास कमी होतो. अर्धा????खसखस पेस्ट,३-४????नारळाचे दुध,चमचाभर मध हे मिश्रण रोज रात्री झोप ताना घेतल्यास कोरडा खोकला कमी होतो. सकाळी उठल्याबरोबर १ किंवा २ ग्लास कोमट पाणी प्या. जेवणानंतरही गरम पाणी घ्यावे.
५) १०० ग्रॅ पाण्यात भिजवले ली द्राक्षे तेवढ्याच साखरेत शिजवुन त्याचा सॉस बनवुन ठेवा.झोपण्यापुर्वी २ चमचे हा सॉस घेतल्याने खोकल्याची ढास येत नाही. कोरड्या खोकल्यावर बदाम रामबाण औषध आहे. पाण्यात भिजवलेले बदाम सोलुन त्याची पेस्ट करून ती सकाळ संध्या लोणी-साखरेत मिसळुन घ्यावी. खोकल्याबरोबरच श्वसनसं स्थेतील इतर बिघाड थोपवण्या साठी रोज ४ तुळशीची पाने ४ मिरी बरोबर चघळावीत.
६) कांद्याचा रस व मध यांचे मिश्रण उत्कृष्ट कफसिरप आहे. उकळत्या पाण्यात १ मध्यम आकाराचा चिरलेला कांदा, एका लिंबाचा रस आणि मध यांचे मिश्रणही असेच काम करते. यामुळे खोकल्यापासून तात्काळ आराम मिळतो. कपभर उकळत्या पाण्यात चमचाभर मार्जोरम(कुठरा) घालुन १५-२० मिनिटे तसेच ठेवा व नंतर त्याचे सेवन करावे.
(सोशल मीडियावरुन साभार)
शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…
शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…
पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…