आरोग्य

वयानुसार किती मिनिट ‘चालल’ पाहिजे, सोप्या व्यायामाचे असंख्य फायदे

१८-३० वर्षे, दिवसातून ३०-६० मिनिट

तरुणांमध्ये सामान्यत: उर्जा पातळी आणि स्नायूंची ताकद जास्त असते, म्हणून ते दररोज ३०-६० मिनिटं वेगाने चालण्याचं टार्गेट ठेवू शकतात. आयुष्याच्या या टप्प्यावर चालणं हे वजन व्यवस्थापित करण्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी आणि निरोगी हृदय ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आता बैठी कामं जास्त असतात. दीर्घकाळ बसण टाळून चालण्याचा सल्ला दिला जातो.

३१-५० वर्षे, दिवसातून ३०-४५ मिनिट

या वयोगटातील लोकांना दररोज ३०-४५ मिनिटं चालण्यामुळे फायदा होऊ शकतो. नियमित चालणं हे वजन नियंत्रित ठेवण्यास, स्नायूंचा टोन उत्तम ठेवण्यास, जुन्या आजारांना प्रतिबंध करण्यास आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यास मदत करू शकतं, ज्याची वयानुसार गरज असते. कामावर चालणे, जेवणाच्या विश्रांती चालणे किंवा पायऱ्या चढणे अशा गोष्टी नियमित करा.

५१-६५ वर्षे, दिवसातून ३०-४० मिनिट

मध्यमवयीन लोकांसाठी, दिवसातून ३०-४० मिनिटं चालणं योग्य असेल. या वयात शरीरातील नैसर्गिक बदलांमुळे, लोकांना स्नायूमध्ये आणि चयापचय दरात घट जाणवते आणि यासाठी व्यायाम महत्त्वपूर्ण बनतो. चालणं तुमची हाडं निरोगी ठेवतं आणि सांधे हलवण्यास मदत होते.

६६-७५ वर्षे, दिवसातून २०-३० मिनिट

वृद्धांसाठी दिवसातून २०-३० मिनिटं मध्यम वेगाने चालणं अत्यंत उपयुक्त ठरतं आणि ते सहज साध्य करता येतं. त्या वयात चालण्याने वयोवृद्धांचा बॅलन्स राहतो आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालींशी संबंधित आजारांपासून बचाव होतो. पडण्याची शक्यता कमी होते. विविध संशोधनं असं दर्शवतात की, नियमित चालण्याचा चांगला प्रभाव पडतो.

दीर्घकालीन आरोग्य स्थिती किंवा सांधे समस्या असलेल्यांना ताण कमी करण्यासाठी ही गोष्ट १५ मिनिटांनी एक छोटा ब्रेक घेऊन दोन सेशनमध्ये करा. एखाद्या ग्रुपसह किंवा मित्रांसह चालण्याने आपली सामाजिक बांधिलकी चांगली राहते आणि मानसिक आरोग्य सुधारतं.

ज्येष्ठ व्यक्ती, दिवसातून १५-२० मिनिट

दररोज १५ ते २० मिनिटं हळूहळू चालण्याचा फायदा ज्येष्ठांना होऊ शकतो. नियमित चालणं हे सांधे लवचिक, स्नायूंची ताकद आणि समतोल यासाठी उपयुक्त ठरतं.

चालण्यासाठी सपाट परिसर, चांगले शूज आणि सुरक्षित मार्ग निवडा. ज्यांना हालचाल करण्यास अडचण येत असेल त्यांनी वॉकर अथवा चालण्यासाठी इतर गोष्टींची मदत घ्यावी. चालण्यामुळे आपला मूड चांगला होतो. थकवा दूर होता आणि एकंदरीत आयुष्यात सकारात्मक बदल होतात.

दैनंदिन चालण्याचा कालावधी वय, फिटनेस लेव्हल, हेल्थ कंडिशन्स आणि पर्सनल गोल्स यासारख्या घटकांवर बदलू शकतो. सामान्य मार्गदर्शक तत्त्व दररोज २०-६० मिनिटं सुचवत असताना, तुमच्या शरीराच्या गरजेनुसार हे करणं आवश्यक आहे. काही परिस्थितीत जसं की, सांधे आणि त्यासंबंधित समस्या किंवा जुने आजार असतात. अशा वेळी आपल्या शरीराचं ऐकणं महत्वाचं आहे. तुम्हाला वेदना किंवा अस्वस्थता वाटत असल्यास, तुमचा दिनक्रम बदला किंवा ब्रेक घ्या.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

14 मिनिटे ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

15 मिनिटे ago

गांधी हत्या समर्थन असंस्कृत; जैन मुनीच्या वक्तव्यावर सपकाळ यांचा संताप

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी राष्ट्रपिता Mahatma Gandhi यांच्या हत्येचे समर्थन…

22 मिनिटे ago

मुंबईत वाढत्या ड्रग्ज व्यापारावर कारवाईची मागणी; ‘ड्रगमुक्त मुंबई’ अभियान राबविण्याचा आग्रह

मुंबई: मुंबई शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते…

25 मिनिटे ago

प्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार काळाच्या पडद्याआड

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सुप्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार (वय ७५ वर्षे) यांचे दीर्घ…

28 मिनिटे ago

महिला आरक्षणावर भाजपाला अधिकार नाही; RSS मध्ये महिला सरसंघचालक नेमून दाखवा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…

9 तास ago