आरोग्य

वयानुसार किती मिनिट ‘चालल’ पाहिजे, सोप्या व्यायामाचे असंख्य फायदे

१८-३० वर्षे, दिवसातून ३०-६० मिनिट

तरुणांमध्ये सामान्यत: उर्जा पातळी आणि स्नायूंची ताकद जास्त असते, म्हणून ते दररोज ३०-६० मिनिटं वेगाने चालण्याचं टार्गेट ठेवू शकतात. आयुष्याच्या या टप्प्यावर चालणं हे वजन व्यवस्थापित करण्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी आणि निरोगी हृदय ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आता बैठी कामं जास्त असतात. दीर्घकाळ बसण टाळून चालण्याचा सल्ला दिला जातो.

३१-५० वर्षे, दिवसातून ३०-४५ मिनिट

या वयोगटातील लोकांना दररोज ३०-४५ मिनिटं चालण्यामुळे फायदा होऊ शकतो. नियमित चालणं हे वजन नियंत्रित ठेवण्यास, स्नायूंचा टोन उत्तम ठेवण्यास, जुन्या आजारांना प्रतिबंध करण्यास आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यास मदत करू शकतं, ज्याची वयानुसार गरज असते. कामावर चालणे, जेवणाच्या विश्रांती चालणे किंवा पायऱ्या चढणे अशा गोष्टी नियमित करा.

५१-६५ वर्षे, दिवसातून ३०-४० मिनिट

मध्यमवयीन लोकांसाठी, दिवसातून ३०-४० मिनिटं चालणं योग्य असेल. या वयात शरीरातील नैसर्गिक बदलांमुळे, लोकांना स्नायूमध्ये आणि चयापचय दरात घट जाणवते आणि यासाठी व्यायाम महत्त्वपूर्ण बनतो. चालणं तुमची हाडं निरोगी ठेवतं आणि सांधे हलवण्यास मदत होते.

६६-७५ वर्षे, दिवसातून २०-३० मिनिट

वृद्धांसाठी दिवसातून २०-३० मिनिटं मध्यम वेगाने चालणं अत्यंत उपयुक्त ठरतं आणि ते सहज साध्य करता येतं. त्या वयात चालण्याने वयोवृद्धांचा बॅलन्स राहतो आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालींशी संबंधित आजारांपासून बचाव होतो. पडण्याची शक्यता कमी होते. विविध संशोधनं असं दर्शवतात की, नियमित चालण्याचा चांगला प्रभाव पडतो.

दीर्घकालीन आरोग्य स्थिती किंवा सांधे समस्या असलेल्यांना ताण कमी करण्यासाठी ही गोष्ट १५ मिनिटांनी एक छोटा ब्रेक घेऊन दोन सेशनमध्ये करा. एखाद्या ग्रुपसह किंवा मित्रांसह चालण्याने आपली सामाजिक बांधिलकी चांगली राहते आणि मानसिक आरोग्य सुधारतं.

ज्येष्ठ व्यक्ती, दिवसातून १५-२० मिनिट

दररोज १५ ते २० मिनिटं हळूहळू चालण्याचा फायदा ज्येष्ठांना होऊ शकतो. नियमित चालणं हे सांधे लवचिक, स्नायूंची ताकद आणि समतोल यासाठी उपयुक्त ठरतं.

चालण्यासाठी सपाट परिसर, चांगले शूज आणि सुरक्षित मार्ग निवडा. ज्यांना हालचाल करण्यास अडचण येत असेल त्यांनी वॉकर अथवा चालण्यासाठी इतर गोष्टींची मदत घ्यावी. चालण्यामुळे आपला मूड चांगला होतो. थकवा दूर होता आणि एकंदरीत आयुष्यात सकारात्मक बदल होतात.

दैनंदिन चालण्याचा कालावधी वय, फिटनेस लेव्हल, हेल्थ कंडिशन्स आणि पर्सनल गोल्स यासारख्या घटकांवर बदलू शकतो. सामान्य मार्गदर्शक तत्त्व दररोज २०-६० मिनिटं सुचवत असताना, तुमच्या शरीराच्या गरजेनुसार हे करणं आवश्यक आहे. काही परिस्थितीत जसं की, सांधे आणि त्यासंबंधित समस्या किंवा जुने आजार असतात. अशा वेळी आपल्या शरीराचं ऐकणं महत्वाचं आहे. तुम्हाला वेदना किंवा अस्वस्थता वाटत असल्यास, तुमचा दिनक्रम बदला किंवा ब्रेक घ्या.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

5 मिनिटे ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

10 मिनिटे ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

16 मिनिटे ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

20 मिनिटे ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

6 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

6 तास ago