आरोग्य

हिवाळ्यात आहार कसा असावा? काय खावे, काय नाही खाल्ले तर तब्येतीवर होतात परिणाम

थंडीची चाहूल लागली की शरीरात काही बदल होतात. सगळ्याच ऋतुंमध्ये आहाराला फार महत्व असते. हवामानानुसार आहारात बदल करणे आरोग्यासाठी फारच आवश्यक असते. हिवाळ्यात शरीराला उष्णतेची गरज असते. अशा वेळी योग्य आहार घेणे फार महत्त्वाचे असते. हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी शरीराला पोषण आणि उष्णता देणारे पदार्थ आहारात असणे आवश्यक आहे. काही साधे बदल करुन आपण हा ऋतू निरोगीपणे आणि आनंदाने जगू शकतो.

सर्वप्रथम थंड पदार्थ टाळा. थंड म्हणजे फक्त चवीला थंड नाही तर जे मुळात थंड असतात. जसे की दही, थंड दूध, आइस्क्रीम, केळी किंवा इतर काही पदार्थ जे सर्दी वाढवतात. थंड पदार्थांमुळे सर्दी-खोकल्याचा त्रास वाढू शकतो. कोमट दूध, आलं-हळदीचं दूध किंवा कोमट पाणी पिण्याची सवय लावा. हे शरीराला आतून उबदार ठेवतात. तसेच उष्ण पदार्थही खा. गूळ, तीळ, शेंगदाणे, ड्रायफ्रूट्स, तूप, बाजरी, नाचणी, मेथी, आलं आणि सुंठ हे पदार्थ हिवाळ्यात विशेष फायदेशीर असतात. हे केवळ उष्णता देत नाहीत तर शरीराला आवश्यक ऊर्जा आणि ताकदही पुरवतात. हिवाळ्यात सर्दी-खोकला टाळण्यासाठी सूप आणि काढे पिण्याची सवय ठेवावी. भाज्यांचे गरम सूप, टोमॅटो सूप, डाळीचे सूप यामुळे शरीराला प्रथिनं आणि उब मिळते. आलं, लवंग, दालचिनी, काळी मिरी, वेलची आणि तुळशी घालून केलेला काढा रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. असा काढा आहारात नक्की असायला हवा.

याशिवाय गाजर, मटार, पालक, मेथी, कारल यांसारख्या हिवाळी भाज्या नियमित खा. हंगामी भाज्या फार पौष्टिक असतात. या भाज्यांमध्ये लोह, जीवनसत्त्व ए आणि सी भरपूर प्रमाणात असते. सकाळी थोडं तूप-गूळ किंवा चहा सोबत खजूर खाल्ल्यास शरीराला तत्काळ ऊर्जा मिळते. थंडीत पाणी कमी प्यायले जाते. घशाला कोरड पडलेली जाणवत नाही मात्र पाण्याची गरज फार असते. त्यामुळे पाणी प्यायला विसरु नका. तसेच कोमट पाणी नियमित प्या, यामुळे पचन चांगले राहते आणि त्वचा कोरडी पडत नाही. थोडक्यात सांगायचं तर, हिवाळ्यात थंड पदार्थांपासून दूर राहा, उष्ण आणि पौष्टिक पदार्थ खा, सूप आणि काढ्यांचा आस्वाद घ्या, या छोट्या सवयींनी तुम्ही थंडीच्या दिवसांतही तंदुरुस्त आणि ताजेतवाने राहू शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नातं हृदयाशी; बायपास सर्जरी

बायपास सर्जरी म्हटले की हातपाय गाळायचे दिवस आता गेले. बायपास केल्यानंतरही योग्य ती काळजी घेऊन…

2 तास ago

दक्षिणेत भाजपाला नकार, केरळमध्ये काँग्रेसचा विजय लोकशाहीचा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष ने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर…

2 तास ago

पश्चिम बंगाल, आसाम निकालांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

मुंबई: शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम बंगाल व आसाम विधानसभा…

2 तास ago

महाराष्ट्र हादरला! ३ वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणाने संताप

मुंबई: महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. नुकत्याच समोर आलेल्या…

7 तास ago

बारामती पोटनिवडणूक निकाल! ‘हा शेवट नाही, नव्या बारामतीची सुरुवात’; सुनेत्रा अजित पवार

मुंबई: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना मतदारांनी दाखवलेला विश्वास हा “आदरणीय अजितदादांच्या पवित्र…

7 तास ago

बीडसह राज्यात अल्पवयीनांवरील अत्याचारांच्या घटनांनी खळबळ; जलद न्याय आणि कडक कारवाईची मागणी तीव्र

पालकांची वाढती चिंता, समाजजागृती आणि यंत्रणांच्या जबाबदारीवर पुन्हा प्रश्नचिन्ह मुंबई: महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या सलग…

7 तास ago