आरोग्य

‘या’ चाचणीने ओळखता येणार कॅन्सरचा धोका; संशोधन काय सांगत

‘कर्करोग’ असे नावही जरी ऐकले तरी अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा उठतो. गेल्या काही वर्षांत या आजाराने जगभरातील अनेकांना विळखा घातला आहे. कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागात तपासणीसाठी साधनसंपत्ती नसल्यामुळे अनेकांना कर्करोगाची लक्षणे लवकर समजत नाहीत. त्यातच आरोग्य सुविधा आणि जागरूकतेच्या अभावामुळे त्याचे निदान अंतिम टप्प्यात असल्यामुळे मृत्युदराचा धोकाही वाढतो आहे. यादरम्यान ‘लिक्विड बायोप्सी’ नावाच्या नव्या रक्त तपासणीमुळे ही परिस्थिती बदलू शकते. या चाचणीच्या मदतीने कर्करोगाचे निदान अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच होऊ शकते, असा दावा आरोग्य तज्ज्ञांनी केला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये सुमारे एक कोटींहून अधिक लोकांचा कर्करोगाने मृत्यू झाला आहे. चिंताजनक बाब म्हणजे, या रुग्णांमध्ये तरुण आणि तरुणींचे प्रमाण सर्वाधिक आहे. तरुणांना तोंडाचा तसेच आतड्यांचा कर्करोग होत असल्याचे दिसून येत आहे; तर तरुणींमध्ये ब्रेस्ट कॅन्सर म्हणजेच स्तनांचा कर्करोगाची समस्या वाढली आहे. कर्करोगाची लक्षणे लवकर ओळखणे हे वैद्यकीय क्षेत्रापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. लिक्विड बायोप्सी या तपासणीमुळे कर्करोगाचा धोका लवकर ओळखता येतो, असा दावा अमेरिकेच्या ‘CANCER’ या प्रतिष्ठित वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून करण्यात आला आहे.

लिक्विड बायोप्सीमुळे कर्करोग लवकर ओळखणे शक्य?

नियमित लिक्विड बायोप्सी तपासणी केल्यास विविध प्रकारच्या कर्करोगांचे लवकर निदान होऊ शकते. ही तंत्रज्ञानात्मक क्रांती कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात नवे दालन उघडू शकते आणि हजारो जीव वाचवू शकते, असे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. सध्या नियमित कर्करोग तपासणी केवळ काही मोजक्या प्रकारांसाठीच केली जाते. मात्र, नव्या संशोधनानुसार ‘लिक्विड बायोप्सी’ किंवा ‘मल्टी-कॅन्सर अर्ली डिटेक्शन टेस्टिंग’ या तंत्राद्वारे उशिराने निदान होणाऱ्या कर्करोगांच्या घटना मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात. त्यामुळे या आजाराला सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखता येईल आणि रुग्णांवर अधिक प्रभावी उपचार केले जातील.

‘लिक्विड बायोप्सी’ नेमकी कशी कार्य करते

सध्या नियमित तपासणीची शिफारस फक्त चार प्रकारच्या कर्करोगांसाठीच केली जाते. परिणामी सुमारे ७० टक्के कर्करोगाची प्रकरणे रुग्णांमध्ये लक्षणे दिसून लागल्यानंतरच उजेडात येतात. त्यातच बहुतांश प्रकरणांमध्ये ही लक्षणे उशिराने म्हणजेच आजाराच्या प्रगत अवस्थेत दिसतात. कर्करोगाचे निदान अंतिम टप्प्यात असल्यामुळे उपचार प्रभावी ठरण्याचे प्रमाण कमी होते आणि मृत्युदराचा धोकाही वाढतो. अशा परिस्थितीत ‘मल्टी-कॅन्सर अर्ली डिटेक्शन टेस्ट’ म्हणजेच एकाच रक्तनमुन्यातून अनेक प्रकारचे कर्करोग शोधण्याची क्षमता ‘लिक्विड बायोप्सी’मध्ये असल्याचा दावा तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे. या पद्धतीमुळे कर्करोगाच्या उपचारांमध्ये मोठे यश मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाराष्ट्र हादरला! ३ वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणाने संताप

मुंबई: महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. नुकत्याच समोर आलेल्या…

4 तास ago

बारामती पोटनिवडणूक निकाल! ‘हा शेवट नाही, नव्या बारामतीची सुरुवात’; सुनेत्रा अजित पवार

मुंबई: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना मतदारांनी दाखवलेला विश्वास हा “आदरणीय अजितदादांच्या पवित्र…

4 तास ago

बीडसह राज्यात अल्पवयीनांवरील अत्याचारांच्या घटनांनी खळबळ; जलद न्याय आणि कडक कारवाईची मागणी तीव्र

पालकांची वाढती चिंता, समाजजागृती आणि यंत्रणांच्या जबाबदारीवर पुन्हा प्रश्नचिन्ह मुंबई: महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या सलग…

4 तास ago

नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी सरकार कटिबद्ध; कुटुंबाच्या पुनर्वसनाची हमी; डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना,…

19 तास ago

विड्याचे पान सेवन करण्याची पद्धत

जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…

1 दिवस ago

कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर

बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…

1 दिवस ago