आरोग्य

‘या’ चाचणीने ओळखता येणार कॅन्सरचा धोका; संशोधन काय सांगत

‘कर्करोग’ असे नावही जरी ऐकले तरी अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा उठतो. गेल्या काही वर्षांत या आजाराने जगभरातील अनेकांना विळखा घातला आहे. कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागात तपासणीसाठी साधनसंपत्ती नसल्यामुळे अनेकांना कर्करोगाची लक्षणे लवकर समजत नाहीत. त्यातच आरोग्य सुविधा आणि जागरूकतेच्या अभावामुळे त्याचे निदान अंतिम टप्प्यात असल्यामुळे मृत्युदराचा धोकाही वाढतो आहे. यादरम्यान ‘लिक्विड बायोप्सी’ नावाच्या नव्या रक्त तपासणीमुळे ही परिस्थिती बदलू शकते. या चाचणीच्या मदतीने कर्करोगाचे निदान अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच होऊ शकते, असा दावा आरोग्य तज्ज्ञांनी केला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये सुमारे एक कोटींहून अधिक लोकांचा कर्करोगाने मृत्यू झाला आहे. चिंताजनक बाब म्हणजे, या रुग्णांमध्ये तरुण आणि तरुणींचे प्रमाण सर्वाधिक आहे. तरुणांना तोंडाचा तसेच आतड्यांचा कर्करोग होत असल्याचे दिसून येत आहे; तर तरुणींमध्ये ब्रेस्ट कॅन्सर म्हणजेच स्तनांचा कर्करोगाची समस्या वाढली आहे. कर्करोगाची लक्षणे लवकर ओळखणे हे वैद्यकीय क्षेत्रापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. लिक्विड बायोप्सी या तपासणीमुळे कर्करोगाचा धोका लवकर ओळखता येतो, असा दावा अमेरिकेच्या ‘CANCER’ या प्रतिष्ठित वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून करण्यात आला आहे.

लिक्विड बायोप्सीमुळे कर्करोग लवकर ओळखणे शक्य?

नियमित लिक्विड बायोप्सी तपासणी केल्यास विविध प्रकारच्या कर्करोगांचे लवकर निदान होऊ शकते. ही तंत्रज्ञानात्मक क्रांती कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात नवे दालन उघडू शकते आणि हजारो जीव वाचवू शकते, असे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. सध्या नियमित कर्करोग तपासणी केवळ काही मोजक्या प्रकारांसाठीच केली जाते. मात्र, नव्या संशोधनानुसार ‘लिक्विड बायोप्सी’ किंवा ‘मल्टी-कॅन्सर अर्ली डिटेक्शन टेस्टिंग’ या तंत्राद्वारे उशिराने निदान होणाऱ्या कर्करोगांच्या घटना मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात. त्यामुळे या आजाराला सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखता येईल आणि रुग्णांवर अधिक प्रभावी उपचार केले जातील.

‘लिक्विड बायोप्सी’ नेमकी कशी कार्य करते

सध्या नियमित तपासणीची शिफारस फक्त चार प्रकारच्या कर्करोगांसाठीच केली जाते. परिणामी सुमारे ७० टक्के कर्करोगाची प्रकरणे रुग्णांमध्ये लक्षणे दिसून लागल्यानंतरच उजेडात येतात. त्यातच बहुतांश प्रकरणांमध्ये ही लक्षणे उशिराने म्हणजेच आजाराच्या प्रगत अवस्थेत दिसतात. कर्करोगाचे निदान अंतिम टप्प्यात असल्यामुळे उपचार प्रभावी ठरण्याचे प्रमाण कमी होते आणि मृत्युदराचा धोकाही वाढतो. अशा परिस्थितीत ‘मल्टी-कॅन्सर अर्ली डिटेक्शन टेस्ट’ म्हणजेच एकाच रक्तनमुन्यातून अनेक प्रकारचे कर्करोग शोधण्याची क्षमता ‘लिक्विड बायोप्सी’मध्ये असल्याचा दावा तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे. या पद्धतीमुळे कर्करोगाच्या उपचारांमध्ये मोठे यश मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

FDA चा कृत्रिम दूध भेसळीच्या राज्यव्यापी रॅकेटवर मोठा घाव; पाच जिल्ह्यांत एकाच वेळी छापे

१.४७ कोटींचा मुद्देमाल जप्त; २० हजार लिटर संशयित दूध जागीच नष्ट, २६ आरोपींवर गुन्हा; १३…

5 तास ago

लुडो खेळाच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; आरोपीसह तिघांना अटक

अमरावती: अमरावती शहरात शनिवारी (४ जुलै) रात्री उशिरा लुडो खेळादरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भीषण…

9 तास ago

रांजणगाव MIDC मध्ये औद्योगिक शांततेसाठी पोलीस-उद्योग प्रतिनिधींची समन्वय बैठक संपन्न

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC परिसरातील औद्योगिक शांतता, कायदा व सुव्यवस्था, कामगार सुरक्षा तसेच…

11 तास ago

मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना महामार्ग बंद; नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

पुणे: राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग (एक्सप्रेसवे) आणि जुना पुणे–मुंबई महामार्ग या…

14 तास ago

‘पाईप चोरी’ प्रकरणात फिर्यादी व स्वच्छता निरीक्षकांची चौकशी करा; अनिल बांडे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषदेतील कथित पाईप चोरी प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, या प्रकरणात…

15 तास ago

पँटमध्ये लपलेल्या विंचवाचा 12 वर्षीय मुलाला दंश; डॉक्टरांच्या प्रयत्नांनी 72 तासांनंतर जीव वाचला

पावसाळ्यात कपडे, शूज आणि वाहन तपासूनच वापरा; विंचू-सापांपासून सावध राहण्याचे आवाहन  चंद्रपूर: पावसाळ्यात घरात विंचू,…

15 तास ago