उष्णतेमुळे शरीरतील पाणी झपाट्याने कमी होते, म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील.
उपाय
नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही.
अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहील.
उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल.
उजव्याच कुशीवर जास्तवेळ झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी आपोआप जास्त वेळ चालू राहील.
हलकाच आहार घ्या. पोट साफ ठेवा. पित्त वाढू देऊ नका.
माठातीलच थंड पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश चवीचवीने प्या. घटाघटा नाही.
आवळा / कोकम / लिंबू / मठ्ठा / ताक इ. सरबत जरूर प्या.
सकाळी ऊठल्यावर लगेच १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या.
प्रत्येक काम सावकाशच करा.
जेवतेवेळी मधे मधे एक दोन वेळा थोडे पाणी प्यावे.
ऊन्हातून आल्यावर गुळ पाणी पिणे.
खडीसाखर सोबतच ठेवून थोडी थोडी खाणे.
जिरेपूड १ चमचा + खडीसाखर १ चमचा व १ ग्लास ताकातून रोज पिणे. उष्णता वाढणार नाही.
दुपारच्या जेवणात रोज पांढरा कांदा जरूर खाणे.
रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल तळपायांना चोळणे व बेंबीत घालणे. तसेच देशी गाईचे तुप नाकात लावणे.
उन्हापासून शरीराचे रक्षण करा. कॅप, छत्री, गाॅगल वापरा.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…
मुंबई: महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची जोरदार मालिका…
शिरूर : शिरूर तालुक्यातील वाघाळे येथे १९ तारखेला पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या प्रेरणेतून कार्यरत स्वाध्याय…
वाघोली : वाघोलीतील 'रविनंदा कॉयलाईट' सोसायटीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. माहेरहून १० लाख रुपये…