आरोग्य

या ६ समस्या असलेल्या लोकांनी चुकूनही खाऊ नये बटाटे

बटाटा वडा असो, बटाट्याची चटणी किंवा भाजी असो, बटाट्याचे चिप्स असो बटाटे भारतीय आहारातील एक महत्वाचा भाग आहेत. बटाट्यांचा वापर वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. बटाटे खाणं लोकांना तर आवडतंच, सोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. मात्र, काही स्थितींमध्ये बटाट्यांचं सेवन आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं.

१) डायबिटीसचे रूग्ण: बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त असतात, जे ब्लड शुगर लेव्हल वाढण्याला कारणीभूत ठरतात. त्यामुळे डायबिटीसच्या रूग्णांनी बटाट्याचं सेवन कमी प्रमाणात करण्याचा सल्ला दिला जातो. जर बटाटे खायचेच असेल तर ते उकडून आणि इतर भाज्यांसोबत मिक्स करून खाऊ शकता.

२) वजन कमी करत असाल तर: बटाट्यामध्ये कॅलरी आणि कार्बोहायड्रेट जास्त असतात. ज्यामुळे वजन कमी करण्यात समस्या होऊ शकते. बटाट्याच्या जास्त सेवनाने शरीरात फॅट जमा होऊ लागतं. अशात तुम्ही इतर कमी कॅलरी आणि जास्त फायबर असलेल्या पदार्थांचं सेवन करू शकता.

३) गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या असणारे: काही लोकांना बटाटे खाल्ल्याने गॅस, सूज किंवा पचनासंबंधी इतर समस्या होऊ शकतात. बटाट्यांमध्ये शुगर आणि स्टार्च असतं. ज्यामुळे काही लोकांना या समस्या अधिक होऊ शकतात. जर कुणाला आधीच पोटासंबंधी समस्या असेल तर त्यांनी बटाटे खाणं टाळलं पाहिजे.

४) एलर्जी असलेले लोक: काही लोकांना बटाट्यांनी एलर्जी होऊ शकते. ज्यामुळे त्वचेवर रॅशेज, खाज आणि इतरही समस्या होऊ शकतात. अशात लोकांनी बटाट्यांचं सेवन टाळलं पाहिजे.

५) हाय यूरिक ॲसिड असेल तर: बटाट्यांमध्ये प्यूरिन भरपूर प्रमाणात असतं, पण याच्या जास्त सेवनाने गाउटच्या रूग्णांना समस्या होऊ सकते. जर कुणाला आधीच यूरिक अॅसिडची समस्या असेल त्यांनी बटाट्याचं सेवन कमी प्रमाणात केलं पाहिजे.

६) हार्ट डिजीज असलेल्यांनी: बटाट्यांचं तळलेल्या रूपात सेवन करणं हृदयरोग असलेल्यांसाठी घातक ठरू शकतं. यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकतं आणि हृदयासंबंधी समस्याही होऊ शकतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबईत हरवलेली चिमुरडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप परत

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…

20 तास ago

प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावर अ.भा.वि.प.चा संताप; जबाबदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…

20 तास ago

‘आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही’! होमगार्डचा आक्रोश; ४० हजार कुटुंबांचा जगण्याचा प्रश्न ऐरणीवर

मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…

20 तास ago

साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांच्या बदल्यांवर वाद; शिवसेनेची चौकशीची मागणी

मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…

20 तास ago

एसटी सौर ऊर्जेचा पहिला टप्पा सुरू; २.५७ मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…

20 तास ago

काँग्रेसचे ‘पुतना मावशीचे प्रेम’; महिलांच्या प्रश्नांवर दुटप्पी भूमिका; डॉ. नीलम गोऱ्हे

महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…

20 तास ago