आरोग्य

या ६ समस्या असलेल्या लोकांनी चुकूनही खाऊ नये बटाटे

बटाटा वडा असो, बटाट्याची चटणी किंवा भाजी असो, बटाट्याचे चिप्स असो बटाटे भारतीय आहारातील एक महत्वाचा भाग आहेत. बटाट्यांचा वापर वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. बटाटे खाणं लोकांना तर आवडतंच, सोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. मात्र, काही स्थितींमध्ये बटाट्यांचं सेवन आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं.

१) डायबिटीसचे रूग्ण: बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त असतात, जे ब्लड शुगर लेव्हल वाढण्याला कारणीभूत ठरतात. त्यामुळे डायबिटीसच्या रूग्णांनी बटाट्याचं सेवन कमी प्रमाणात करण्याचा सल्ला दिला जातो. जर बटाटे खायचेच असेल तर ते उकडून आणि इतर भाज्यांसोबत मिक्स करून खाऊ शकता.

२) वजन कमी करत असाल तर: बटाट्यामध्ये कॅलरी आणि कार्बोहायड्रेट जास्त असतात. ज्यामुळे वजन कमी करण्यात समस्या होऊ शकते. बटाट्याच्या जास्त सेवनाने शरीरात फॅट जमा होऊ लागतं. अशात तुम्ही इतर कमी कॅलरी आणि जास्त फायबर असलेल्या पदार्थांचं सेवन करू शकता.

३) गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या असणारे: काही लोकांना बटाटे खाल्ल्याने गॅस, सूज किंवा पचनासंबंधी इतर समस्या होऊ शकतात. बटाट्यांमध्ये शुगर आणि स्टार्च असतं. ज्यामुळे काही लोकांना या समस्या अधिक होऊ शकतात. जर कुणाला आधीच पोटासंबंधी समस्या असेल तर त्यांनी बटाटे खाणं टाळलं पाहिजे.

४) एलर्जी असलेले लोक: काही लोकांना बटाट्यांनी एलर्जी होऊ शकते. ज्यामुळे त्वचेवर रॅशेज, खाज आणि इतरही समस्या होऊ शकतात. अशात लोकांनी बटाट्यांचं सेवन टाळलं पाहिजे.

५) हाय यूरिक ॲसिड असेल तर: बटाट्यांमध्ये प्यूरिन भरपूर प्रमाणात असतं, पण याच्या जास्त सेवनाने गाउटच्या रूग्णांना समस्या होऊ सकते. जर कुणाला आधीच यूरिक अॅसिडची समस्या असेल त्यांनी बटाट्याचं सेवन कमी प्रमाणात केलं पाहिजे.

६) हार्ट डिजीज असलेल्यांनी: बटाट्यांचं तळलेल्या रूपात सेवन करणं हृदयरोग असलेल्यांसाठी घातक ठरू शकतं. यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकतं आणि हृदयासंबंधी समस्याही होऊ शकतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

6 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

6 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

7 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

12 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

12 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

12 तास ago